शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी तक्रार आली तर दखल घेणार नाही

By admin | Updated: September 29, 2016 02:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना : हिवाळी परीक्षांचे परीक्षा प्रवेशपत्र दोन आठवड्यांअगोदरच तयार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेला ५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रवेशपत्रांवरून मागील वेळी झालेला गोंधळ लक्षात घेता यंदा दोन आठवड्यांअगोदरच परीक्षा प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जर प्रवेशपत्रांबाबत काही तक्रारी असतील त्या अगोदरच विद्यापीठाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. वेळेवर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे विद्यापीठाने महाविद्यालयांना बजाविले आहे.
हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीएसस्सी, एमए, एलएलबी, एमबीए, एमसीए, एमकॉम या विषयांच्या पुरवणी परीक्षांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांची यादी जाहीर केली आहे. विद्यापीठाने परीक्षा अर्ज दाखल करणे तसेच परीक्षा प्रवेशपत्रे जारी करणे ही प्रक्रिया ‘आॅनलाईन’ केली आहे. महाविद्यालयांचा हलगर्जीपणा, विद्यापीठातील तांत्रिक चुका इत्यादी कारणांमुळे मागील दोन परीक्षांपासून सातत्याने ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करावी लागली होती. अनेक महाविद्यालयांकडून तर ऐनवेळी ‘आॅफलाईन’ परीक्षा अर्ज सादर करण्यात आले होते. याचा फटका पुढे निकालांनादेखील बसला व ‘डाटा’चा गोंधळ झाल्याने काही जणांचे निकाल अनुपस्थित असे आले होते.
ही सर्व बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने यंदा अनेक महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’वर विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविली आहेत. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे १ ते २ दिवसांत ‘आॅनलाईन’च उपलब्ध होतील.
जर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्या तर त्या महाविद्यालयांनी वेळीच विद्यापीठाला कळवाव्यात, असे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांनी आवाहन केले आहे. परीक्षा प्रवेशपत्रे अगोदरच पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या अगोदर कुणी तक्रार घेऊन आले तर त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात येणार नाही. अशा परिस्थिती जर कुठला विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर त्याची जबाबदारी ही महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासनाची राहील, असेदेखील डॉ.खटी यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)