शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:45 AM

परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा सार्वजनिक ठिकाणी वा दुसऱ्याच्या घराजवळ कचरा टाकू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची देशभरात दहशत पसरली आहे. बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ म्हणीनुसार स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असायला पाहिजेत. त्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर होईल. आरोग्य चांगले राहील. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण काही मोजके नागरिक सोडले तर किती जण ही जबाबदारी पार पाडतात? याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहेच. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून दिसला की, सफाई कर्मचारी येत नसल्याची महापालिकेकडे तक्रार केली जाते. ती केलीच पाहिजे, पण आपल्या घरातील कचरा कचरागाडीत टाकतो का? घराचा परिसर स्वच्छ ठेवतो का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.अनेक जण शिल्लक अन्न घराच्या आजूबाजूला टाकतात. काही तर शेजाऱ्यांच्या ओट्यावर टाकतात. घरातील कचरा, कचरागाडीत न टाकता उघड्यावर फेकतात. यामुळे कचरा फेकणाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बहुमजली इमारतीत वरच्या माळ्यावरील महिला खिडकीतून कचरा खाली फेकतात. यामुळे खाली राहणाऱ्यांना त्रास होतो. अनेकदा तक्रार करूनही सवयी बदललेल्या जात नाही. परंतु यामुळे शेजाऱ्यांसोबतच कचरा फेकणाऱ्यांच्या आरोग्याला तितकाच धोका असतो. मात्र कचरा फेकणाऱ्यांना याचा विसर पडला आहे.

तक्रार करा, दंड होईलसार्वजनिक ठिकाणी, घराच्या आजूबाजूला अनेकजण कचरा टाकतात. घरातील शिळे अन्न आजूबाजूला टाकले जाते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असा प्रकार निदर्शनास आल्यास झोन कार्यालयाकडे तक्रार करा, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ओला आणि सुका कचरा विलग करूच द्यावा, हाऊ सिंग सोसायट्यांनी ओल्या कचºयाची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यांनी यापासून कंपोस्ट खत तयार करावे. शहर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)

ओला व सुका कचरा वेगळा कराओला आणि सुका कचरा विलग करून कचरागाडीत टाकला तर त्यावर प्रक्रिया करणे सोयीचे जाते. ओला आणि सुक्या कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढीगच्या ढीग डम्पिंगला जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.हे करता येणे शक्य आहे...घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये आयताकृती सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात सोसायटीतील ओला कचरा दिवसांप्रमाणे त्यात टाका, त्यापासून चांगले खत तयार होईल.

मास्क कुठेही टाकू नकासंसर्ग होऊ नये यासाठी नागरिक मास्क वापरत आहेत. वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. वापरलेले मास्क कागदात गुंडाळून कचरागाडीत टाका, तसेच हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोमेडिकल वेस्टमध्येच टाकले जावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

बाजारातील कचरापेट्या नागरिकांसाठीबाजार भागात कचरा होऊ नये यासाठी कचरापेट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र यात दुकानदार कचरा टाकतात. या पेट्या नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी कचरा संकलन करून कचरा गाडीत टाकावयाचा आहे.

टॅग्स :SocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस