शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शंभर दिवसात खोक्या अनं बेताल वक्तव्य करणारे मंत्री पाहिले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 17:43 IST

Nagpur : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महायुतीचे सरकार निवडून येताना मतांची चोरी करून निवडून आले आहे. वाढीव ७५ लाख मते कुठून आली याचे उत्तर अजून दिलेले नाही. सरकार शंभर दिवसांच्या कार्यकाळात खोक्या आणि बेताल वक्तव करणारे मंत्री आपण पाहिले. या शंभर दिवसात जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस नेते राहुल गांधी हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरसंघचालक, योगी आणि काही खासदार जनगणना नको म्हणाले होते. ‘जो जात की बात करेगा, उसे लात दुंगा’, असेही काही लोक म्हणाले होते. आता निर्णय घेतला पण सरकारचे अनेक जुमले आपण पाहिले तसा हा जमला असू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्यादोन्ही पवार येतील, अशी महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले, बऱ्याच चर्चा महाराष्ट्रभर आहे. यावर पूर्ण काही झाल्यावरच भाष्य करता येईल. आम्ही महाविकास आघाडी मधून लोकसभा विधानसभा निवडणुका लढलो आहोत. आम्ही सोबत आहोत. जी काही परिस्थिती पुढच्या काळात निर्माण होईल त्यावर भाष्य करता येईल. आज त्यावर भाष्य करता येणार नाही. जोपर्यंत खिचडी शिजत आहे तोपर्यंत शिजू द्या, असा सूचक इशारा सपकाळ यांनी दिला. काँग्रेसने संघटना वर्ष जाहीर केले. त्यानुसार आवश्यक बदल सुरू केले आहेत. हे संघटना वर्ष असल्याने फेरफार आणि आवश्यक बदल वर्षभरात होणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम हल्ल्यावर अधिवेशन बोलवापहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. या मुद्यावर सरकारसोबत राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत झाला. देश एक आहे, हे दाखविण्यासाठी सरकारने अधिवेशन बोलवावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर