शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कापूस किती दिवस घरी ठेवायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST

कळमेश्वर : शेतमालाला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी केली जाते. परंतु तालुक्यात १९ हजार ८९० क्विंटल कापूस ...

कळमेश्वर : शेतमालाला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी केली जाते. परंतु तालुक्यात १९ हजार ८९० क्विंटल कापूस खासगी खरेदी केंद्रावर विकला गेला. शासकीय केंद्रावर विक्रीसाठी ५९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल खासगी कापूस खरेदी केंद्रावर कमी दरात विकावा लागत आहे. यात आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने कापसासाठी ५,५१५ ते ५,८२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव ठरविला. परंतु प्रत्यक्षात कापसाला प्रतिक्विंटल ५,२०० ते ५,५५० पर्यंतच भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे सरासरी २५० ते ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत येणाऱ्या सेलू, कोहळी, धापेवाडा येथील खासगी कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत १९ हजार ८९० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु अद्याप शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. काही वर्षापासून बाजारात कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पणन महासंघाला कापूस विकणे बंद केले होते. परंतु यावर्षी पावसाने कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढलेला आहे. परंतु सद्यस्थितीत कापसाला खासगी खरेदी केंद्रावर शासनाच्या हमीभावापेक्षा जवळपास २५० ते ६०० रुपये प्रति क्विंटल कमी भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

----

यावर्षी कापसाच्या उत्पन्नात ४० ते ५० टक्के घट असल्याने भाव वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापूस योग्य वेळी विकण्यासाठी आणावा.

- बाबाराव पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमेश्वर