शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्गावरून हायकोर्टाचा भडका

By admin | Updated: February 5, 2015 01:04 IST

वन विभागाने मनसर-खवासा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन लांबलचक भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे ठेवल्यामुळे हायकोर्टाचा भडका उडाला.

वन विभागाला खडसावले : वास्तविकता समजण्याची सूचनानागपूर : वन विभागाने मनसर-खवासा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन लांबलचक भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणापुढे ठेवल्यामुळे हायकोर्टाचा भडका उडाला. वास्तविक परिस्थितीला गाठोड्यात गुंडाळून वागत असलेल्या वन विभागाला हायकोर्टाने पुन्हा एकदा कडक शब्दात फटकारले. केंद्र शासनाने मनसर-खवासा मार्गाच्या चौपदरीकरणाला कोणत्या शर्तीवर परवानगी द्यायची, हे निश्चित करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. समितीने या मार्गावर नऊ भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवून एकूण खर्च ३३४ कोटींपर्यंत कमी केला आहे. यापूर्वी मनसर ते खवासापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची सूचना करण्यात आली होती. त्यावर ७५० कोटी रुपये खर्च येणार होता. नवीन प्रस्तावात दोन भुयारी मार्ग १००० मीटरचे, तर एक भुयारी मार्ग ३०० मीटरचा आहे. हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आल्यानंतर, महामार्ग प्राधिकरणाने या तीन भुयारी मार्गावर आक्षेप घेतला. या भुयारी मार्गांवर २०० कोटी रुपयांवर खर्च येईल, असे सांगितले. न्यायालयानेही ही बाब मान्य करून वन विभागाची खरडपट्टी काढली. वन्यप्राण्यांना जाण्या-येण्यासाठी एवढ्या लांबलचक भुयारी मार्गाची आवश्यकताच काय आहे. याकरिता १०० मीटरचा भुयारी मार्गही पुरेसा ठरू शकतो. या मार्गाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रवास करीत आहे. यादरम्यान भरधाव वाहनामुळे वन्यप्राण्यांचा अपघात झाल्याचे ऐकीवात नाही. यासंदर्भात कुठे बातम्याही प्रकाशित झालेल्या नाहीत. वन विभागाकडे याविषयीची आकडेवारी असल्यास पटलावर सादर करावी, असे न्यायालयाने नमूद करून वन विभागाला दोन आठवड्यांत वास्तविकतेला अनुसरून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.वन विभागाची परवानगी नसल्यामुळे मनसर-खवासा रोडचे चौपदरीकरण रखडले आहे. न्यायालयाने यासंदर्भात स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)