शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या मूल्यांकनाला फटका

By admin | Updated: March 11, 2015 02:04 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे ...

नागपूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन) पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलनास मंगळवारपासून सुरुवात झाली. असहकाराच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या मूल्यांकनाला फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी उपराजधानीत केवळ तीन ते चार हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित असून सरकारने त्यावर तोडगा काढलेला नाही. मागीलवर्षीदेखील याच मागण्यांवरून संघटनेने पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना याबाबत वारंवार पत्रं पाठविण्यात आली. परंतु त्यांनी संघटनांना साधे चर्चेसाठीदेखील बोलाविले नाही. त्यामुळे असहकार पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मंगळवारी नागपूर विभागातील या दोन्ही संघटनांचे सदस्य असलेल्या शिक्षकांनी दिवसभरात प्रत्येकी एक या प्रमाणेच उत्तरपत्रिका तपासल्या.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. परंतु त्यावर सकारात्मक तोडगा समोर आला नाही. असहकारामुळे मूल्यांकनाला मोठा फटका बसू शकतो. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर समस्या गंभीर होऊ शकते असे शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मत ‘विज्युक्टा’चे महासचिव अशोक गव्हाणकर यांनी व्यक्त केले. दरम्यान शुक्रवारी शासनाने शिक्षक संघटनांना परत चर्चेसाठी बोलविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)