शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीचे १२ तासात पाच बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:16 AM

उपराजधानीत कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही.

ठळक मुद्देचार निराधार वृद्धांनी सोडले उघड्यावर जीव पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडाक्याच्या थंडीने अवघ्या १२ तासात चार निराधारांचे बळी घेतले. मृत झालेल्या चारही वृद्धांची ओळख पटलेली नाही. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी पोलीस ठाण्यात शनिवारी या घटनांची नोंद अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली, तर रविवारी सकाळी ताजबाग परिसरात एका वृद्धाचा मृतदेह आढळला.शनिवारी पहाटे एमआयडीसीतील तकियावाले बाबा दर्ग्याजवळ सुमारे ८० वर्षांच्या वृद्धाचा मृतदेह आढळला. त्यानंतर सकाळी १० वाजताच्या सुमारास कळमन्यातील विद्यार्थी वसतिगृहाजवळ एक ६० वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळला. दुपारी ४ च्या सुमारास मेयोतील आकस्मिक तपासणी कक्षाजवळ एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर अजनी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयाजवळ ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. हे चारही वृद्ध निराधार आणि अनोळखी आहेत. ते उघड्यावरच राहून मिळेल ते खात होते. हक्काचा निवारा नसल्याने आणि आप्तस्वकीय काळजी घ्यायला जवळ नसल्याने कडाक्याच्या थंडीत ते रात्र काढायचे. गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढल्याने या चारही जणांचा बळी गेला. त्याचप्रमाणे मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी नारायण महादेवराव जगराळे (वय ६३) हे रविवारी सकाळी लहान ताजबाग परिसरात मृतावस्थेत आढळून आले. एमआयडीसी, कळमना, तहसील आणि अजनी तसेच सक्करदरा पोलिसांनी हे कडाक्याच्या थंडीचे बळी आहेत की नाही, ते स्पष्ट केले नाही. त्यांची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू