शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अखेर जाग आली

By admin | Updated: July 26, 2014 02:58 IST

रस्त्यांवरील डांबर उघडून बारीक गिट्टी

रस्त्यांवरील गिट्टी साफ करण्यास सुरुवात : कामाची चौकशी करानागपूर : रस्त्यांवरील डांबर उघडून बारीक गिट्टी रस्त्यावर साचली आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन जागे झाले. शुक्रवारी रस्त्यांवरील गिट्टी साफ करण्यास सुरुवात करण्यात आली. सदर येथील माऊंट रोडवरील रस्त्यापासून याची सुरुवात झाली. दरम्यान रस्त्यांच्या बांधकामातील गुणवत्ता चव्हाट्यावर आल्याने शहरातील नागरिकांनी यासंबंधात आवाज उचलला असून रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शहरातील रस्ते वर्षभरापूर्वीच बांधण्यात आले. काही रस्ते तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले होते. परंतु या रस्त्यांची गुणवत्ता पावसानेच ठरवली. तीन दिवसाच्या पावसात या रस्त्यांची धुळधाण झाली. ज्या रस्त्याने वाहन चालकांना आपली वाहने चालविण्यात आनंद वाटायचा त्याच रस्त्यांवरून आज वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. गिट्टीखदान चौक ते सीपीडब्ल्यूडी कॉलनी, अनंतनगर, जाफरनगर, मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा, जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक, लोकांची शाळा ते रेशीमबाग चौक, अजनी पोलीस स्टेशन ते तुकडोजी पुतळा, मोक्षधाम ते ग्रेट नागरोड, वर्धा रोडवरील हॉटेल प्राईड ते उड्डाण पूल, महाराज बाग चौक ते आकाशवाणी चौक, प्रतापनगर, लक्ष्मीनगर दीक्षाभूमी, व्हेरायटी चौक ते वाडी, नीरी ते सुरेंद्रनगर, आरपीटीएस आदींसह शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची हीच अवस्था आहे. त्यामुळे सामान्य नागरिकही आता पुढे आले असून यासंबंधात आवाज उचलत आहेत. जनतेच्या कररूपी पैशातून हे रस्ते तयार झाले असून शहरातील याच रस्त्यांसाठी प्रत्येक वाहनचालकाकडून रोड टॅक्सचे व्यतिरिक्त डिझेल व पेट्रोलवर १ रुपया प्रतिलिटर सेस वसूल केला जात आहे. शहरातील याच रस्त्यांसाठी चारचाकी वाहनचालकांकडून टोलटॅक्स वसुलणे अजूनही सुरू आहे. सर्वच रस्त्यांसाठी नागपूरकरांकडून पैसा वसूल करण्यात येत असेल तर योग्य गुणवत्तेचे रस्ते बनविणे ही मनपाची जबाबदारी आहे, त्यामुळे मनपाने याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारपासून रस्त्यांवर पसरलेली गिट्टी साफ करण्याच्या कामाला सुरुवात झाली खरी परंतु ती केवळ काही विशिष्ट रस्त्यांपुरतीच मर्यादित होती. शहरातील बहुतांश रस्त्यांची परिस्थिती अजूनही तशीच आहे. त्याकडे महापालिका कधी लक्ष देणार, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)माकपाचे मनपा आयुक्तांना निवेदन तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे नागपुरातील रस्त्यांवरील वरचा खडीचा थर उखडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या रस्त्यांच्या बांधकामाला जबाबदार असलेले ठेकेदार व मनपा अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने केली असून यासंबंधीचे निवेदन शुक्रवारी पक्षाच्यावतीने मनपा आयुक्त श्याम वर्धने यांना सादर करण्यात आले आहे. ंआरटीओचे बांधकाम विभागाला पत्र‘लोकमत’ने शुक्रवारी प्रकाशित केलेले ‘धुळीत नागपूर’ याची दखल प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरनेही घेतली. कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, शहरातील अनेक रस्ते उखडल्याने बारीक गिट्टीचा खच जमा झाला आहे. यामुळे वाहनाचा ब्रेक लागण्यास उशीर होतो. अनेक वाहनधारक यामुळे घसरून पडत असल्याची, तर काही अपघात झाल्याची माहिती येत आहे. परिणामी कार्यालयाच्यावतीने बांधकाम विभागासह संबंधित कार्यालयांना याची दखल घेण्याचे पत्र देण्यात येणार आहे. कंत्राटदारांना पोसण्याचा प्रयत्न शहरातील रस्त्यांच्या बांधकामाची गुणवत्ता ही अतिशय निकृष्ट होती. त्यामुळे एकाच पावसात रस्त्यांची ही दुरवस्था झाली आहे. नीरी ते आरपीटीएस दरम्यानचा रस्ता तर अतिशय खराब झाला आहे. पुन्हा रस्ता व्यवस्थित केला जाईल. त्यासाठी पुन्हा पैसा खर्च होईल. एकूणच हा सर्व कंत्राटदारांना पोसण्याचाच प्रकार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुरेंद्रनगर आरपीटीएस येथील ज्येष्ठ नागरिक आर.बी. मांगे यांनी दिली आहे.