शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: July 7, 2014 01:07 IST

मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे भिवापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी

भिवापूर तालुक्यातील प्रकार : पावसाने दडी मारल्याने फसगतभिवापूर : मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसाच्या सरींमुळे भिवापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारली. त्यामुळे ही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी या पिकांना डब्याने पाणी देणे सुरू केले आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात उमरेड उपविभागातील काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आता पाऊस येणार, असे समजून भिवापूर तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. जमिनीत थोडीफार ओलावा असल्याने सदर बियाणे अंकुरले. त्यातच पावसाने दडी मारली. उन्हामुळे पिकांचे अंकुर कोमेजण्याची पर्यायाने पीक नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. ज्यांच्या शेतात ओलिताची सुविधा आहे, त्यांनी या पिकांना विहिरीचे पाणी देत पिके जगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, ज्यांच्या शेतात ओलिताचे कुठलेही साधन नाही, त्यांनी दूरवरून ड्रम अथवा अन्य साधानाने शेतात पाणी आणले आणि मजुरांकरवी डब्याच्या साहाय्याने या पिकांना पाणी देत पिके जगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काहींनी धानाचे पऱ्हेही टाकली. मात्र, पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने रोवणे थांबले आहेत. कपाशीचे पीक जगविण्यासाठी काही शिवारात महिला डोक्यावर गुंड घेऊन येताना दिसून येते. या पिकांना डब्याने पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत पाणी देण्याचे काम सुरू असते. घरातील कर्ता पुरुष विहिरीतून बादलीने पाणी काढतो तर, महिला हंड्याने शेतापर्यंत पोहचवतात. भारनियमनामुळे विहिरीत पाणी असूनही पिकांचे ओलित करणे शक्य होत नसल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आठवडाभर जर पाऊस बरसला नाही तर, यातील अनेकांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या हंगामातील पिके अतिवृष्टी व गारपिटीने उद्ध्वस्त केलीत. शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा खर्च करून पेरणी केली. त्यातच पावसाने दगा दिला. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ उद्भवल्यास ती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना सतावत आहे. (तालुका प्रतिनिधी)