शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 05:30 IST

‘खोया-पाया’ केंद्रांची तत्परता : २२ हजारांहून अधिक बेपत्ता भाविकांचा शोध

- योगेश पांडे
प्रयागराज : हिंदी चित्रपट व विविध कथांच्या माध्यमातून कुंभमेळा म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे ‘बिछडना’ आणि त्यानंतर वर्षानुवर्षे त्यांचा शोध असे अनेकांच्या मनावर कोरले गेले आहे. मात्र १४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभाने हा समज खोडून काढला आहे. ६० कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीत जवळपास २२ हजारांहून अधिक भाविक आप्तस्वकीयांपासून दुरावल्या तर गेले. मात्र तंत्रज्ञान व प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यातील बहुतांश जणांचा शोध लावण्यातदेखील यश आले. जागोजागी उभारण्यात आलेल्या ‘खोया-पाया’ केंद्रांनाच याचे क्रेडिट देण्यात येत आहे.

महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये देशविदेशातून भाविक पोहोचत असून अखेरच्या आठवड्यात तर हे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. सर्वच ठिकाणी पाय ठेवायलादेखील जागा नसल्याचे चित्र आहे. या गर्दीत एकदा हात सुटला की सोबतचे कधीही दुरावतील अशीच स्थिती आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध लागावा यासाठी दरवेळेप्रमाणे यंदादेखील प्रयागराजमध्ये ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या व त्यातील बहुतांश जणांचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात प्रशासनाला यश आले.

तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्राची जोड
महाकुंभ क्षेत्रात दहाहून अधिक ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. ही प्रामुख्याने महाकुंभातील विविध सेक्टर तसेच संगम, झुंसी, अरैल घाट, फाफामऊ, प्रयागराज रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आहेत. ही केंद्र संगणकीकृत आहेत. तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फेस रेकग्निशन सिस्टम, मशीन लर्निंगचादेखील वापर करण्यात येत आहे. सर्व केंद्र एकमेकांशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तीला शोधणे सोपे होत असल्याची माहिती केंद्राचे सल्लागार विनयकुमार दुबे यांनी ‘लोकमत’ला दिली.

विविध भाषांमध्ये होते अनाउन्समेन्ट
‘खोया-पाया’ केंद्रामध्ये देशाच्या विविध भागांतील नागरिक हरविल्याच्या तक्रारी येत आहेत. काहींना हिंदी नीट पद्धतीने समजत नाही. अशा लोकांसाठी मराठी, तेलुगू, गुजराती अशा विविध भाषांमध्येदेखील उद्घोषणा करण्यात येत आहे. हरविलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कुठल्या जागेवर यावे याची माहितीदेखील देण्यात येते. तसेच जागोजागी लागलेल्या एलईडी स्क्रीन्सवर फोटोदेखील ‘डिस्प्ले’ करण्यात येतात. तसेच सोशल माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे.

कुटुंबीयांना दिला जातोय ‘आधार’
विशेष म्हणजे या ‘खोया-पाया’ केंद्रांवर हरविलेला व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांना आधारदेखील दिला जातो. त्यांच्या तात्पुरत्या निवासाचीदेखील सोय करण्यात आली आहे. महिलांसाठीदेखील वेगळी सोय करण्यात आली आहे.

हरविणाऱ्यांमध्ये ‘बीपीएल’ नागरिकांचे प्रमाण जास्त
महाकुंभात येणाऱ्या बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन्स किंवा साधा मोबाइल फोन तरी आहे. मात्र गरीब लोकांकडे असे चित्र नसते. त्यामुळे बेपत्ता झाल्यावर ते लगेच शोध घेऊ शकत नाहीत. शिवाय शिक्षण नसल्याने अनेकांना ओळखीच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकदेखील लक्षात नसतो. अशा लोकांकडे फोटोदेखील नसल्याने ‘फेस रिकग्निशन कॅमेरे’देखील कामात येत नाहीत, अशी माहिती इन्टिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे इन्चार्ज व आयपीएस अधिकारी अमित कुमार यांनी ‘लोकमत’ला दिली.
 

टॅग्स :Prayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळा