शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांवर पर्यावरण अधिभार

By admin | Published: February 12, 2016 3:25 AM

नागपूर शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांवर पर्यावरण अधिभार लावण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सादर केला.

उच्च न्यायालयात सरकारचा प्रस्तावनागपूर : नागपूर शहरात प्रवेश करणाऱ्या जड वाहनांवर पर्यावरण अधिभार लावण्याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे सादर केला. सामाजिक कार्यकर्ते अमोल खंते यांनी अ‍ॅड. मोहित खजांची यांच्यामार्फत दाखल केलेली जनहित याचिका सुनावणीस आली असता मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी सरकारचा हा प्रस्ताव सादर केला. नागपूर शहरात जड वाहने प्रवेश करतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. अपघात होतात. जी वाहने नागपूर शहर टाळून परस्पर बाहेर जाऊ शकतात ती वाहनेसुद्धा शहरात येतात. या वाहनांना पर्यायी रस्ते उपलब्ध असताना तसेच बाह्य रिंगरोड सुरू असतानाही ही वाहने शहरात विनाकारण प्रवेश करतात. त्यामुळे या वाहनांना शहरात प्रवेशासाठी बंदी घालण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला जनहित याचिकेद्वारे वेळोवेळी केली. उच्च न्यायालयानेही या विषयावर पर्यायी उपाययोजना करण्याचे निर्देश वेळोवेळी सरकारला दिले होते. या याचिकेवरील गत सुनावणीदरम्यान २९ आॅक्टोबर २०१५ रोजी उच्च न्यायालयाने परिवहन सचिवांना ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. २१ जानेवारी २०१६ रोजीही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत सरकारने पर्यायी उपाययोजना केली नाही तर न्यायालयाला जनहितार्थ योग्य आदेश पारित करावा लागेल.उच्च न्यायालयाच्या या इशाऱ्यानंतर लागलीच २८ जानेवारी २०१६ रोजी परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूरचे पोलीस आयुक्त, परिवहन आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त, नगरविकास विभागाचे उपसचिव, गृह विभागाचे परिवहन उपसचिव आणि परिवहन उपायुक्त (निरीक्षण) असे सात अधिकारी उपस्थित होते. या प्रस्तावाच्या संदर्भात राज्य सरकारला योग्य अधिसूचना जारी करता यावी, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. मोहित खजांची, सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे आणि मनपाच्या वतीने अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)बैठकीतील निर्णय शहरात येणाऱ्या जड वाहनांवर पर्यावरण अधिभार लावण्यात यावा, असा अधिभार लावण्याबाबतची सूचना सर्वोच्च न्यायालयाने एम. सी. मेहताविरुद्ध भारत सरकार या प्रकरणात केली होती. नागपुरातील संपूर्ण रिंगरोड तयार होईपर्यंत ज्या रस्त्यांवरून जड वाहने शहरात प्रवेश करतात, अशा ठिकाणी मनपाने स्वखर्चाने किंवा आऊट सोर्सिंगद्वारे बुथ उभारावे, बुथवर येणाऱ्या आस्थापना खर्चाचा अंदाज घेण्यात यावा, किती ठिकाणी असे बुथ उभारावे लागतील याबाबतचा अभ्यास मनपाने करावा. पर्यावरण अधिभाराचा दर ठरविण्यात यावा, ज्या वाहनांना नागपूर शहर टाळण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध नाही, अशा वाहनांना कमी अधिभार आणि ज्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध आहे तरीही शहरात प्रवेश करतात, अशा वाहनांना जास्त अधिभार लावण्यासाठी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अभ्यास करून तसा प्रस्ताव परिवहन आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. बुथवर जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग आस्थापना खर्चा व्यतिरिक्त मनपा क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्याकरिता तसेच रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी करण्यात यावा, हे निर्णय घेताना येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात यावी, अधिभार न भरणाऱ्या वाहनांविरुद्ध वाहतूक पोलीस आणि परिवहन कार्यालयाने कारवाई करावी, असे या प्रस्तावात नमूद केला आहे.