शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ड्राय पोर्टच्या घोषणेमुळे विदर्भ, मराठवाड्यातील उद्योगांना लाभ

By admin | Updated: August 17, 2014 00:52 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा आणि औरंगाबादला ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल.

देवेंद्र फडणवीस : रोजगार निर्मिती होणारनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा आणि औरंगाबादला ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. यामुळे विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. या भागातील उद्योगाला त्याचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.मुंबईजवळील जेएनपीटीमध्ये शनिवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गडकरी यांनी विदर्भातील वर्धा आणि मराठवाड्यातील औरंगाबाद येथे ‘ड्राय पोर्ट’ उभारण्याची घोषणा केली. या घोषणेचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. ‘ड्राय पोर्ट’ उभारल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील निर्यातदारांना त्याचा फायदा होईल व आयातदारांची सोय होईल. आयात-निर्यात मालासाठी बंदरावर कस्टमच्या मंजुरीसह ज्या प्रक्रिया पार पाडायच्या असतात, त्या सर्व ‘ड्राय पोर्ट’वर पार पाडल्या जातात. गडकरींच्या घोषणेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात समुद्र नसतानाही बंदराची व्यापारी सुविधा मिळेल. या माध्यमातून या भागातील उद्योगाला चालना मिळेल व त्यातून रोजगार निर्मितीही होईल, असे फडणवीस यांनी कळविले आहे. उपलब्ध साधनांचा देशाच्या विकासासाठी कल्पकतेने वापर करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)भाजप कार्यालयात ध्वजारोहणनागपूर : महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारपासून मुक्ती मिळाल्यावरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा होईल,असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या शहर कार्यालयात फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. देशात सुराज्य आणण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मात्र यासाठी फक्त दिल्लीतील परिवर्तन पुरेसे नाही तर महाराष्ट्रासह इतरही राज्यांत परिवर्तन करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. कार्यक्रमाला आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, महापालिकेतील सत्ता पक्षनेते प्रवीण दटके, प्रमोद पेंडके उपस्थित होते.