शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टी

By admin | Updated: July 24, 2014 00:59 IST

बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस नरखेड (१५६.२० मि.मी.) तालुक्यात झाला. नागपूर जिल्ह्यात

अनेक घरांची पडझड : १३ जनावरे दगावली, भिवापूर परिसरातील रस्ते बंदनागपूर : बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस नरखेड (१५६.२० मि.मी.) तालुक्यात झाला. नागपूर जिल्ह्यात १३०.९७ मि.मी पाऊस पडला. रामटेक तालुक्यात १५५ मि.मी, कामठी १४२ मि.मी, उमरेड १३५.१० मि.मी., काटोल १३३.४० मि.मी., कुही १२८.४० मि.मी, पारशिवनी १२८ मि.मी. सावनेर १२६.६० मि.मी. मौदा १२१.४० मि.मी., हिंगणा १२०.३० मि.मी., भिवापूर १०७ मि.मी., तसेच कळमेश्वर तालुक्यात १०३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. १ जून ते २३ जुलैपर्यंत एकूण ४४७.८४ मि.मी.(१०३ टक्के) पाऊस झाला.मौदातालुक्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहेगाव तसेच गोवरी-खरबी दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. सांड नदी दुथडी वाहत आहे. परिणामी मोहाडी - बोरगाव हा मार्ग बंद झाला आहे. धानला - चारभा, घोटमुंढरी - खात, रेवराल - धर्मापुरी, लापका माार्गवरील रपट्यावरून पाणी वाहत असल्याने तो मार्गसुद्धा बंद झाला आहे. चिचोली - दहेगाव - खात मार्ग बंद झाला आहे. भंडारा - रामटेक मार्गावरील रपट्यांवरूनही पाणी वाहात असल्याने तो मार्ग बंद झाला आहे. पुरामुळे धामणगाव, आजनगाव, मांगलीतेली, भेंडाळा आदी अनेक गावांचा दुसऱ्या गावांसोबत संपर्क तुटला आहे. मौदा - निमखेडा मार्ग बंद झाला आहे. कन्हान - तारसा ज्वॉर्इंट - तारसा - अरोली हा मार्ग बंद झाला आहे. नानादेवी, किरणापूर, कुंभापूर, कोपरा या गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे माथनी येथील शेतकऱ्यांना मोठ्या पुलावरून फेरा मारून शेतात ये-जा करावी लागत आहे. मौदा तालुक्यात शनिवारी ८.६ मिमी, रविवारी २८.६, सोमवारी २९.४, मंगळवारी सकाळपर्यंत ४६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून २२ जुलैपर्यंत एकूण ४०२.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कळमेश्वरतालुक्यात गेल्या २४ तासांत १०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्व नदी- नाल्यांना पूर आला. ६० पेक्षा अधिक घरांचे अंशत: नुकसान झाले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी दुपारच्या सुमारास विश्रांती घेतली. मात्र वारा वेगाने वाहात होता. पूरपरिस्थितीवर तहसील प्रशासनाची नजर असून यंत्रणा सज्ज आहे.भिवापूरमुसळधार पावसामुळे मरु, नक्षी, चिखली या नद्या दुथडी भरून वाहात आहे. सर्वत्र पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंत भिवापूर येथे १०७ मिमी, कारगाव येथे १३४.८, नांद येथे ११७ तर मालेवाडा येथे ३५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नक्षी, चिखली, नांद, चिखलापार नदीला पूर आल्याने भिवापूर - चंद्रपूर, भिवापूर - जवळी, नांद - गिरड व उमरेड - गिरड - हिंगणघाट मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प पडली. पुरामुळे नदी काठावरील शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कामठीतीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर बुधवारी दुपारच्या सुमारास कमी झाला. कन्हान नदी दुथडी भरून वाहात आहे. कामठी परिसरात बुधवारी १४६.६ मिमी, कोराडी १३२.६, वडोदा ११२.२, दिघोरी परिसरात ११३.४० मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती तहसलीदार विद्यासागर चव्हाण यांनी दिली. पावसामुळे शासकीय कार्यालय, शाळा - महाविद्यालयात शुकशुकाट होता. कुही रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उसंत दिली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. मंगळवारी रात्री वडोदा मार्गावरील नाग नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. उमरेड - कुही, कुही - नागपूर मार्गावरील वाहतूकही काही वेळ बंद होती. पूर ओसरताच वाहतूक सुरू झाली. तालुक्यात बुधवारी सकाळपर्यंत १३२.१७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे तीन घरांची पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. पचखेडी येथे विद्युतपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा तुटल्या. याबाबत वीज वितरणला माहिती मिळताच तातडीने हजर होऊन वीजपुरवठा सुरळीत केला. या परिसरात तितूर येथे १२५.४, राजोली १३६.२, मांढळ १३१.२, पचखेडी १५२, वेलतूर येथे १२०.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. (प्रतिनिधींकडून)१३ जनावरे दगावलीकाटोल तालुक्यात गेल्या २४ तासांत १३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. संततधार पावसामुळे तालुक्यातील ७३ गावांतील ३४० घरांचे अंशत: नुकसान झाले. डोरली (भिंगारे) येथील सात, पारडसिंगा, चंदनपारडीसह इतर गावातील असे सहा अशी एकूण १३ जनावरे दगावली. डोरली भिंगारे येथील चंद्रभान ठाकरे यांच्याकडे धुरखेडा (बोरगाव) येथील २० जनावरे चराईसाठी होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनावरांना चराईसाठी बाहेर नेता आले नाही. तसेच त्यांच्याकडे चारासाठा नसल्याने ती जनावरे एका जागेवर बांधून होती. त्यातच त्यातील सात जनावरे दगावली. त्यांच्याकडील १७ जनावरे आजारी आहेत. पारडसिंगा येथे एक म्हैस तर मसाळा येथे एक बैल, एक गाय दगावली. आजारी जनावरांवर पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. लाडुकर, डॉ. चिमोटे, डॉ. पखाले, डॉ. घोडमारे उपचार करीत आहे. संततधार पावसामुळे मूर्ती येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपण भिंत तसेच चाफ्याचे मोठे झाड पडले. नदी-नाले दुथडी वाहात असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे तहसीलदार सचिन गोसावी यांनी सांगितले.