शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
4
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
5
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
6
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
7
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
8
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
9
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
10
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
12
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
13
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
14
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
15
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
16
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
17
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
18
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
19
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
20
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पामुळे हॉटेल, पर्यटन, प्रवास व्यावसायिकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST

मेहा शर्मा नागपूर : गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे लागू झालेले लॉकडाऊन हॉटेल, प्रवास व पर्यटन व्यवसायासाठी नुकसानकारक ठरले. या व्यवसायाला ...

मेहा शर्मा

नागपूर : गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे लागू झालेले लॉकडाऊन हॉटेल, प्रवास व पर्यटन व्यवसायासाठी नुकसानकारक ठरले. या व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु, त्यांची निराशा झाली.

यासंदर्भात हॉटेल सेंटर पॉईंटचे मालक मिक्की अरोरा म्हणाले, केंद्र सरकारला आमचा पूर्णत: विसर पडला. आम्हाला बँकेकडून व मालमत्ता करामध्ये काहीच दिलासा मिळाला नाही. हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या संख्येत मनुष्यबळ वापरले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे या व्यवसायाला वाईट दिवस पाहावे लागले. असे असताना आम्हाला अर्थसंकल्पात काहीच लाभ देण्यात आला नाही. सरकारने आदरातिथ्य व सेवा क्षेत्राबाबत उदासीनता दाखविली. सरकारने केवळ मुंबईसारख्या शहरांना अधिक महत्त्व देऊन मालमत्ता कर माफ केला आहे. या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण सरकारने निराशा केली.

तुली इम्पेरियल हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक कुक्कू तुली यांनीही समान मत व्यक्त केले. सरकारने हाॅटेल व्यवसायाला जोरदार धक्का दिला. वर्तमान काळात ३५ ते ४० टक्के व्यवसाय करणेही कठीण झाले आहे. या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी व मालमत्ता करामध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा होती. तसेच, प्रवास उद्योगाला उभारी देण्यासाठी ठोस तरतूद केली जाईल असे वाटत होते. परंतु, तसे काहीच झाले नाही असे तुली यांनी सांगितले.

ट्रॅव्हल एजन्टही या अर्थसंकल्पामुळे नाराज झाले आहेत. नोवा ट्रॅव्हल्सचे सीईओ व ट्रॅव्हल एजन्टस असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय समिती सदस्य गुरमित विज म्हणाले, प्रवास उद्योग अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. परंतु, यावर्षीचा अर्थसंकल्प या उद्योगाची निराशा करणारा आहे. एवढा मोठा उद्योग असताना त्याकरिता एक रुपयाचीही तरतूद करण्यात आली नाही. या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. पर्यटन जीएसटी व करामध्ये सवलत दिली जाईल, असे वाटत होते.

जॅक्सन ट्रॅव्हलचे मालक हरमनदीप आनंद यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. कोरोनाचा फटका सर्वात आधी प्रवास उद्योगाला बसला. असे असताना या उद्योगाला सावरण्यासाठी काहीच करण्यात आले नाही. तसेच, इतर उद्योग वाढल्याशिवाय प्रवास उद्योग पूर्वपदावर येऊ शकत नाही. प्रवास करण्यासाठी नागरिकांना रोजगार व पैसे मिळणे आवश्यक आहे. खासगी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. त्याचा हॉटेल व प्रवास उद्योगावर १०० टक्के प्रभाव पडला आहे. त्यामुळे या उद्योजकांना कर्मचारी कमी करावे लागले किंवा त्यांच्या वेतनात कपात करावी लागली. या उद्योगांना रुळावर येण्याकरिता आणखी एक-दोन वर्षे लागतील. हॉटेल व प्रवास उद्योगाने आत्मनिर्भर व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. सर्वांनी हेच केले पाहिजे. आपण कुणाच्याही मदतीशिवाय पुन्हा उभे राहायला हवे, अशी भूमिका आनंद यांनी मांडली.