शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या चार स्तंभाच्या कार्यातूनच समाजाचा विकास

By admin | Updated: December 17, 2015 03:12 IST

लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पां. वा. गाडगीळ व बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे थाटात वितरणनागपूर : लोकशाहीत राजकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रत्येकाजवळ स्वत:ची अशी एक सत्ता आहे. त्यामुळेच प्रत्येक स्तंभाच्या सत्तेने आपले कार्य समाजाच्या कल्याणासाठीच केले पाहिजे. लोकशाहीचे हे चारही स्तंभ मजबूत असेल तर समाजाचा विकास गतीने साधता येणे शक्य आहे. यात प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे; कारण प्रसारमाध्यमांचा प्रभाव इतर तीन स्तंभांवर पडतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले.लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेतील विजेत्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आजची पत्रकारिता आणि शासन’ विषयावर वेदप्रकाश वैदिक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ७.३० वाजता आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमतने राज्याच्या कानाकोपऱ्यात एक लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून पोहोचण्याचा प्रयत्न केला. केवळ वृत्तपत्र म्हणून न राहता लोकमतने एका सामाजिक चळवळीचे स्वरूप घेतले आणि समाजातील तळागाळातल्या माणसांच्या वेदना मांडण्याचे काम केले. त्यामुळेच हे वृत्तपत्र लोकप्रिय होऊ शकले आणि लोकांचा विश्वास जिंकू शकले. या पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे लेखन उल्लेखनीय आहे. समाजातील अखेरच्या माणसाच्या प्रश्नांकडे, वेदनेकडे लक्ष वेधण्याचे काम या विजेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षाला विधानभवनात आपले म्हणणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हाच महत्त्वाचा स्रोत असतो. त्यामुळेच पत्रकारिता निर्भीड आणि सत्यावर आधारित असली पाहिजे. आपण जे लिहितो आहोत त्याने समाजाचे काय भले होणार? याचा विचार पत्रकारितेने केला पाहिजे. पां.वा. गाडगीळ आणि बाबा दळवी यांनी समाजाभिमुख पत्रकारिता केली. त्यांनी पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नावाने असलेल्या या पुरस्कारासह त्यांच्या आदर्शाचीही प्रेरणा सर्व विजेत्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन लोकमत मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी तर आभार लोकमत नागपूरचे संपादक दिलीप तिखिले यांनी मानले. (प्रतिनिधी)लोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर उज्ज्वल परंपरा- सुरेश द्वादशीवारलोकमत हे केवळ वृत्तपत्र नाही तर एक उज्ज्वल परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी या वृत्तपत्राला लोकमत हे नाव दिले. लोकनायक बापूजी अणे यांनी लोकमत हे साप्ताहिक चालविले आणि त्यानंतर श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींनी ते अर्धसाप्ताहिक आणि दैनिक केले. यामागे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, प्रबोधनाची आणि सामाजिक दायित्वाची परंपरा आहे. त्यामागे एक इतिहास आहे. या परंपरेच्यावतीने विजेत्या पत्रकारांचा सत्कार होत आहे, ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे मत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्यावतीने ललित आणि वैचारिक साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार सुरेश द्वादशीवार यांना जाहीर झाला. यानिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.