शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

By admin | Updated: September 11, 2014 01:08 IST

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.

विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण : नागपूर विभाग साजरे करतेय रजत जयंती वर्षनागपूर : मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.विभागात १९८३ मध्ये विद्युतीकरणाला सुरुवात झाली. विभागात पहाडी भागात हेलिकॉप्टरच्या साह्याने विद्युत खांब बसविण्यात आले. विद्युतीकरणाचे कठीण काम पूर्ण करताना विभागात नागपूर-वर्धा-बल्लारशा भागात ११ सप्टेंबर १९८९ ला रेल्वेगाडी क्रमांक २६१५ जीटी एक्स्प्रेस ही पहिली विद्युतीकरण झालेली गाडी धावली. सप्टेंबर १९८९ मध्ये नागपूर-वर्धा-बल्लारशा या ४४० किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर वर्धा-बडनेरा २३१ किलोमीटरच्या खंडात १९९१ मध्ये नागपूर ते इटारसी ही ५७३ किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन १९९१ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या खंडाचे दुहेरीकरण, ब्रॉंच लाईन, साईडिंगमध्ये विद्युतीकरण झाले. सप्टेंबर २०१४ पर्यंत १७४१ रेल्वे किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण होऊन तेथे विद्युत इंजिन धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामासाठी १४ ट्रॅक्शन सब स्टेशन कार्यरत आहेत. विद्युतीकरणाचे नेटवर्क नागपुरातील सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अ‍ॅक्विझिशन तंत्रज्ञानाने करण्यात येते. विद्युत इंजिनच्या देखभालीसाठी २२ सप्टेंबर १९९० रोजी अजनीत विद्युत लोकोशेडची स्थापना करण्यात आली. या विद्युत लोकोशेडमधून पहिले इंजिन २२ आॅक्टोबर १९९० ला सुरू झाले. अजनी विद्युत लोकोशेडमध्ये १९८९ मध्ये ५ विद्युत लोको होते. आता ही संख्या २०१४ मध्ये २०० झाली आहे. अजनीच्या विद्युत लोकोशेडमध्ये डब्लुएजी ५ (३८५०), डब्लुएजी ७ (५००० एचपी), डब्लुएएम ४ (३६४० एचपी), डब्लुएपी १ (३७६०), डब्लुएपी ४ (५००० एचपी), एसी/डीसी डब्लुएसीएम ३ (५०००/४७०० एचपी) या इंजिनचा समावेश आहे. यासोबतच ३ फेज विद्युत इंजिनमध्ये डब्लुएपी ५ (५४४० एचपी), डब्लुएपी ७ (६३५० एचपी), डब्लुएजी ९ (६००० एचपी) या विद्युत इंजिनची देखभालही करण्यात येते. विभागात विद्युतीकरणानंतर रेल्वेची वजन क्षमता १७ ते २४ डब्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून वेळेची बचतही होत आहे. विद्युतीकरणामुळे मालगाड्यांची क्षमताही २३०० टन ते ५३०० टनपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ५१ टक्के डिझेलची बचत झाली असून विभागाला डिझेलच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ४२० कोटींचे वीज बिल भरावे लागले आहे. (प्रतिनिधी)