शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:00 IST

यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणत: बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाकंडून पुढील शैक्षणिक सत्रातील नव्या प्रवेशांसाठी तयारी सुरू होते. महाविद्यालयांचा भर व्यवस्थापन कोट्याच्या जागा भरण्यावर असतो व त्यासाठी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यावर भर असतो. परंतु यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.‘कॅप’च्या अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो. या जागा जास्तीत जास्त प्रमाणात कशा भरतील यासाठी काही महाविद्यालयांकडून बारावीच्या परीक्षेला एक ते दीड महिन्याचा अवकाश असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बैठकांचा जोर सुरू झाला होता. रिक्त जागांचे प्रमाण कमी करून प्रवेश कसे वाढतील या मुद्यावरच या बैठकांमध्ये जोर देण्यात आला. दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल यासंदर्भात चाचपणीदेखील झाली होती. मात्र अचानकपणे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि महाविद्यालयांच्या आराखड्यावर पाणी फेरल्या गेले. मागील वर्षी ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त होत्या. नागपुरातील तर काही मोजक्या महाविद्यालयांतच ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले होते. त्यामुळे आता व्यवस्थापन कोट्याच्या जागा कशा भरायच्या व बाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचायचे, हा प्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर पडला आहे.

ऑनलाईन संपर्कावरच भरगेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. सोबतच विद्यार्थ्यांना विविध ऑफर्सदेखील देण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे आता ऑनलाईन संपर्कावरच भर आहे. काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाºया बाहेरील राज्यांतील शिकवणी वर्गांच्या चालकांशी संपर्क साधला आहे, अशी माहिती या प्रक्रियेत असणाºया एका महाविद्यालय प्रतिनिधीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस