शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचार्‍यांना पीएफची प्रतीक्षा

By admin | Updated: May 18, 2014 01:06 IST

चार किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी जर एखाद्या खासगी कार्यालयात काम करीत असेल तर, त्या कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी कपात करणे गरजेचे असते,

चंद्रपूर : चार किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी जर एखाद्या खासगी कार्यालयात काम करीत असेल तर, त्या कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी कपात करणे गरजेचे असते, मात्र शासकीय सेवेत कंत्राटी स्वरुपात लाखो कर्मचारी काम करूनही त्यांना भविष्यनिर्वाह निधी किंवा अन्य सोयी उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने राज्यातील जवळपास दोन लाख कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, भारत निर्माण कार्यक्रम, संपूर्ण स्वच्छता अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, पाणलोट विकास कार्यक्रम, मागास क्षेत्रविकास कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, महिला व बालकल्याण विभाग, जलस्वराज्य प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनात कंत्राटी पद्धतीनेच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचारी कमी वेतनामध्ये गावागावात जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवित आहे. अतिरिक्त वेळ देऊन काम करतात. आज घडीला राज्यात जवळपास दोन लाख कंत्राटी कर्मचारी सेवा देत आहे. या सर्व कर्मचार्‍यांना ७ ते ४० हजारापर्यंत कामानुसार वेतन दिल्या जात आहे. मात्र त्यांच्या भविष्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने अनेकवेळा या कर्मचार्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच कंत्राटी कर्मचार्‍यांनाही सुविधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे. मात्र या मागणीकडे शासनासह राज्यातील कर्मचारी संघटनांनीही दुर्लक्ष केले आहे. (नगर प्रतिनिधी)