शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रतिपूर्ती वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शाळांना मिळणाऱ्या प्रतिपूर्तीत केंद्र व राज्य सरकारचा वाटा असतो. राज्य सरकार त्याचे ...

नागपूर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत शाळांना मिळणाऱ्या प्रतिपूर्तीत केंद्र व राज्य सरकारचा वाटा असतो. राज्य सरकार त्याचे वितरण शिक्षण विभागाला करते आणि शिक्षण विभाग शाळांना निधी देते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शिक्षण विभाग आरटीईच्या प्रतिपूर्तीबाबत वेगवेगळी माहिती देत आहे. २०१८-१९ या सत्रात आरटीईसाठी केंद्र सरकारने राज्याला १०० टक्के निधी दिल्याचे सांगितले. राज्य सरकारने सांगितले की ५० टक्के निधी वाटप केला. तर शिक्षण विभागाकडून शाळांना २८.५ टक्के निधी वितरित करण्यात आला.

हे सर्व आकडे माहितीच्या अधिकारात आरटीई फाउंडेशनने मिळविले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व शिक्षण विभागांनी दिलेल्या माहितीत असलेली तफावत लक्षात घेता, आरटीईच्या प्रतिपूर्ती वाटपात मोठा घोळ असल्याचा आरोप फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन काळबांडे यांनी केला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार २०१८-१९ या सत्राचे राज्य सरकारला ६८३.७५ कोटी रुपये आरटीईसाठी दिले. राज्य सरकारने दिलेल्या माहितीत ९० कोटी इतका निधी जो ५० टक्के आहे, तो आरटीईच्या प्रतिपूर्तीसाठी शिक्षण संचालकांना वितरित केला. तर ९ मार्च २०२१ च्या पत्रात शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी स्पष्ट केले की २०१८-१९ चा २८.५ टक्के निधीच शासनाकडून मिळाला. यावरून लक्षात येते की तीनही संस्थांमध्ये आरटीईची प्रतिपूर्ती वाटपात कोणताच ताळमेळ नाही. राज्य शासनाकडून २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षातील निधी वितरित करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. परंतु शाळांना निधी प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी शाळा संचालकांच्या आहे.

- गेल्या चार वर्षांपासून आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना मिळालेली नाही. त्यामुळे ८ मार्च रोजी आरटीई फाउंडेशनने आझाद मैदानावर उपोषण केले. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चर्चेला बोलावून ७ दिवसात वित्त मंत्रालयात मागणी करून निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले. ७ दिवसात आरटीईच्या प्रतिपूर्ती संदर्भात कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन