शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2023 21:04 IST

Nagpur News रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

नागपूर : वीज केंद्रांमध्ये कोळसा टंचाई निर्माण झाल्याने राज्यावर वीज संकट ओढवण्याची शक्यता आहे. सातत्याने होत असलेल्या बैठकांमुळे महानिर्मिती, कोळसा कंपन्या व रेल्वेमध्ये समन्वय वाढला आहे. रेल्वेद्वारे कोळशाची लोडिंग वाढविण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोळशाचा समाधानकारक साठा होण्यास वेळ लागणार आहे.

राज्यातील नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीजकेंद्रात कोळशाचा नाममात्र साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत रेल्वेच्या बडनेरा सेक्शनमध्ये थर्ड लाइनच्या बांधकामासाठी ब्लॉक घेतले जात आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांची गती मंदावली आहे. यामुळे नाशिक, भुसावळ, पारस व परळी या वीज केंद्रांना होणारा कोळसा पुरवठा प्रभावित झाला आहे. आता रेल्वे, कोळसा कंपनी व महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर कोळसा पुरवठ्यात वाढ झाली आहे. आता दररोज ११ रॅकऐवजी १४ रॅक पुरवठा होत आहे. त्यामुळे परिस्थिती सुधारली आहे. नाशिकमध्ये ४, भुसावळ १, पारस २ व परळी येथे ३.५ दिवस पुरेल, एवढाच कोळशाचा साठा शिल्लक असल्यामुळे परिस्थिती संवेदनशील आहे.

चार युनिट बंद

- कोळसा संकटामुळे महानिर्मितीचे चार युनिट ठप्प झाले आहेत. यात कोराडी वीज केंद्रातील युनिट क्रमांक ३, ६ व ९, तसेच चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ६ चा समावेश आहे. गॅस टंचाईमुळे उरण प्रकल्पातील ३ युनिट बंद आहेत.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट