शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे नागरिकांचा उद्रेक

By admin | Updated: May 16, 2014 00:51 IST

पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील

नागपूर : पाचपावली येथील गोंडपुरा भागात मागील काही दिवसांपासून नळातून दूषित पाणी येत आहे. परंतु याकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त नागरिकांनी दूषित पाणी घेऊन गुरुवारी सतरंजीपुरा येथील ओसीडब्ल्यू कार्यालयावर धडक दिली आणि अधिकार्‍यांच्या समोरच दूषित पाणी ओतून समस्येकडे लक्ष वेधले.

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पाचपावली परिसरातील गोंडपुरा वस्तीमध्ये नळामधून दूषित पाणी येत आहे. दररोज दुपारी १२ वाजता त्यांच्या वस्तीत नळ येतो. परंतु नळ सुरू करताच दूषित पाणी येते. तब्बल ४ तास दूषित पाणी जाऊ दिल्यानंतर नळाला कापड लावून पाणी भरावे लागते. यानंतरही त्याच्यातील दूषितपणा जात नाही. पाण्यात फिटकरी टाकावी लागते. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वस्तीतील महिला ज्युली उके, मंदा मसराम, माया उईके, काजल गेडाम आदी महिला आजारी पडल्या आहेत. या परिसरातील नागरिकांनी बहुतांश यासंबंधात अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या परंतु काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी दूषित पाणी बॉटलमध्ये भरले आणि ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना आपली समस्या समजावून सांगत त्यांच्यासमोरच दूषित पाणी ओतले. अधिकार्‍यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. येत्या दोन दिवसात समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन बिसेन यांच्यासह अमित उके, गोपाल वाणी, सुरज उके, नितेश गेडाम, रवी मसराम, सचिन उके, धवन आतराम, पंकज हटवार आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होते. (प्रतिनिधी)