शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन अंत्योदय’साठी निकषपात्र ग्रामपंचायतींची निवड

By admin | Updated: June 4, 2017 17:31 IST

केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे.

जितेंद्र दखने 

अमरावती केंद्र शासनाने सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मिशन अंत्योदय राबविण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत सन २०१९ पर्यंत ग्रामपंचायतींना द्रारिद्रयमुक्त करणे व १ कोटी ग्रामीण कुटुंब द्रारिद्रयरेषेच्यावर आणण्यात येणार आहेत.मिशन अंत्योदय अंतर्गत राज्यासाठी ५ हजार २२७ ग्रामपंचायतींचे उद्दिष्ट्य दिले आहे. ग्रामपंचायतींची या मिशनसाठी निवड करण्यासाठी आठ निकष निश्चित केले असून याद्वारे ग्रापंची निवड करण्याच्या सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत. केंद्र शासनाच्या विविध कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीतून हे उद्दिष्ट्य साध्य करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आता मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील निकषपात्र ग्रामपंचायतींची चाचपणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या आठ निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतीच यामध्ये निवडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी किती ग्रामपंचायती मिशनसाठी पात्र ठरतात, हे लवकरच पडताळणीनंतर स्पष्ट होईल. त्यानंतर पात्र ग्रामपंचायतींची यादी शासनाकडे पाठविली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.काय आहेत आठ निकष ?हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगट कार्यरत असलेल्या ग्रामपंचायती, जलसंधारणाची कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायती, सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेली ग्रामपंचायत, रूरर्बन क्लस्टर योजनेंतर्गत निवडलेली ग्रामपंचायत, गुन्हेगारीमुक्त व तंटामुक्त ग्रामपंचायत, राज्य शासनाकडून विशेष लाभासाठी निवडलेली ग्रामपंचायत व पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची मिशन अंत्योदयसाठी निवड करण्यात येणार आहेत.काय आहेत शासनाच्या सूचना ?‘मिशन अंत्योदय’साठी वरील निकषांमध्ये बसणाऱ्या ग्रामपंचायतींचा समावेश करावा. हे करताना या ग्रामपंचायतींच्या सभोवतालच्या १० ग्रामपंचायत समूहाचा कस्टर प्राधान्याने करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. अभियानांतर्गत ग्रामपंचायत तसेच राज्य शासनाकडून खालील बांधिलकी केंद्र शासनाला अपेक्षित आहे. यामध्ये द्रारिद्रय निर्मूलनासाठी तसेच ग्रामसभेतील सक्रिय सहभागाबाबत ग्रापं कटिबद्ध असावी, गावांतील स्वयंसहायता बचतगट प्रत्येक कुटुंबासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा, लोकसहभागातून गावविकास आराखडा तयार करण्यास कटिबद्धता असावी, मानव संसाधन व सशक्तीकरण, आदर्शवाद, माहिती, शिक्षण व संप्रेषण इत्यादींंबाबत कटिबद्ध असावे.