शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

४७ डिग्री तापमानात नागपुरात सीबीएसईच्या शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 9:32 PM

नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली : शिक्षण विभागाकडून बघ्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातील तापमान लक्षात घेता, २६ जूनपासून शाळा सुरू व्हाव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिले आहे. पण या आदेशाकडे सीबीएसईच्या शाळा पुरत्या दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमान ४७ डिग्रीवर असताना, काही सीबीएसई शाळा सुरू झाल्या आहेत. दुपारी १२.३० वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवून, सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच मानत नाही, असे दाखवूनच दिले आहे.गेल्या आठवडाभरापासून नागपुरात सातत्याने तापमान ४७ डिग्री सेल्सिअसवर जात आहे. दररोज उष्माघाताने मरणाऱ्यांची संख्या वाढते आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा इतका असतो की बाहेर पडणे कठीण झाले आहे. नागपूरकरांनी एकप्रकारे उन्हाचा धसकाच घेतला आहे. अशा वातावरणात सीबीएसई शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविले आहे. सोमवारी पूर्व नागपुरातील सीबीएसई बोर्डाच्या एका प्रसिद्ध शाळेने ८ ते १० वर्ग सुरू केले. सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान शाळा सुरू होती. पण जिल्हा प्रशासनाने एकीकडे शाळा २६ जूननंतर सुरू करण्याचे निर्देश दिले असताना, ३ जूनपासून शाळा कशी सुरू झाली, यावर पालकांनीही आक्षेप घेतला. पण शाळा व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे पालकांनी विनातक्रार मुलांना शाळेत पाठविले. शाळा संपल्यानंतर भर दुपारी विद्यार्थी खांद्यावर दप्तराचे ओझे घेऊन उन्हात घरी परतले. उन्हाच्या तडाख्यामुळे प्रत्येक जण हैराण असताना, या विद्यार्थ्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. सीबीएसई शाळांच्या बाबतीत शिक्षण विभाग उदासीनजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही सीबीएसईच्या शाळा ३ जूनपासून कशा सुरू झाल्या, यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, चौकशी करावी लागेल. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनाही अवगत केल्यानंतर त्या शाळेचा सीबीएसईच्या संदर्भातील टाइमटेबल बघावा लागेल, असे सांगितले. सीबीएसई शाळेच्या अशा हेकेखोर भूमिकेवर शिक्षण विभागाकडून बघ्याची भूमिका घेतली जाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली होत असताना, बघावं लागेल, चौकशी करावी लागेल, असे वक्तव्य प्रशासनाकडून अनपेक्षित आहे.

टॅग्स :SchoolशाळाTemperatureतापमानStudentविद्यार्थीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय