शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भय्याजी जोशी ठरले संघविस्ताराचे चाणक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 07:00 IST

Nagpur news संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली.

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वयाच्या ७४ व्या वर्षांपर्यंत जबाबदारी सांभाळलेल्या भय्याजी जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदाचा एक तपाचा प्रवास शनिवारी संपला. मागील काही काळापासून संघाच्या कार्यविस्तारात जोशी यांचे नियोजन फार महत्त्वाचे ठरले. संघकार्याच्या विस्ताराचे शिवधनुष्य पेलणे ही सोपी बाब नव्हती. मात्र संघसेवेसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी मात्र केवळ संघकार्याचा विस्तारच केला नाही तर, देशात संघाचे वर्चस्व निर्माण करण्यात मौलिक भूमिका पार पाडली. खऱ्या अर्थाने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनात ते संघासाठी ‘चाणक्य’च ठरले, असे संघधुरिणांचे मत आहे. जोशी यांनी पुढील कार्यकाळासाठी दत्तात्रेय होसबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मार्च २००९ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधीसभेत जोशी सरकार्यवाहपदी पहिल्यांदा निवड करण्यात आली. त्यानंतर सातत्याने त्यांची निवड झाली व १२ वर्षांत त्यांनी संघाला तरुणाईपर्यंत नेण्यात मौलिक भूमिका पार पाडली. प्रकृती ठीक नसतानादेखील त्यांनी कर्तव्य बजावत संघविस्ताराचे सखोल नियोजन केले होते.

 

कोरोनाकाळात देशभरात प्रवास

कोरोनामुळे २०२० साली संघाची अ.भा. प्रतिनिधीसभा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभरात सरसंघचालक व भय्याजी जोशी यांनी देशभराचा प्रवास केला. कोरोनामुळे संघ पदाधिकारी व स्वयंसेवकांच्या आरोग्याला अपाय होऊ नये, यासाठी जोशी यांनी स्वतः देशातील सर्व क्षेत्रात जाण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय लॉकडाऊनमध्ये देशपातळीवर झालेल्या मदतकार्यातदेखील त्यांच्या मार्गदर्शनात नियोजन झाले होते.

शेषाद्रीनंतर सर्वाधिक काळ सलग सरकार्यवाह

भय्याजी जोशी हे १२ वर्षे सलग सरकार्यवाह राहिले. तर हो.वे. शेषाद्री यांनी १३ वर्षे या पदाची सलग धुरा सांभाळली होती. शेषाद्री १९८७ साली सरकार्यवाह झाले होते व २००० सालापर्यंत ते त्या पदावर होते.

 

हे राहिले सरकार्यवाह

गोपाल मुकुंद हुद्दार - १९२९ ते १९३१

डी.आर. लिमये - १९३१ ते १९३४

एच.व्ही. कुलकर्णी - १९३४ ते १९३७

जी.एस. पाध्ये - १९३७ ते १९३९

गोळवलकर गुरुजी - १३ ऑगस्ट १९३९ ते ३ जुलै १९४०

भय्यासाहेब काळे - १९४० - १९४५

भय्याजी दाणी - १९४५ ते १९५६

एकनाथ रामकृष्ण रानडे - १९५६ ते १९६२

भय्याजी दाणी - १९६२ ते १९६५

बाळासाहेब देवरस - १९६५ ते १९७३

माधव मुळे - १९७३ ते १९७७

रज्जूभय्या - १९७७ ते १९८७

हो.वे. शेषाद्री - १९८७ ते २०००

डॉ. मोहन भागवत - २००० ते २००९

भय्याजी जोशी - २००९ ते २०२१

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ