शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

नागपुरात पावसाने गाठली सरासरी; धरण अजूनही कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:42 IST

१४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे.

ठळक मुद्देशहरात टंचाईची झळ : तोतलाडोहचा उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात जून आणि जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे जिल्ह्यात यावर्षी भीषण टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती होती. परंतु जुलैच्या शेवटी ऑगस्ट महिन्यात पावसाने ही भीती दूर केली. १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला आहे. परंतु अजूनही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची झळ बसत आहे. 

नागपूर शहराला कदाचित पहिल्यांदाच पावसाळ्यातही टंचाईचा सामना करावा लागतो आहे. शहरामध्ये एक दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की, शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. एका दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. मात्र कुणीही या गंभीर प्रश्नावर ओरडत नाही, ही शोकांतिका आहे. जिल्ह्यात १४ आॅगस्टपर्यंत पडणारा सरासरी पाऊस ६४३.९२ मि.मी. आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६६२.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी, शहराला पाणी पुरवठा करणारे तोतलाडोह, कामठी खैरी या प्रकल्पात अनुक्रमे २.३२ आणि २७.९० टक्के पाणी साठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे तोतलाडोहचा उपयुक्त पाणीसाठा अजूनही शून्य असून, कामठी खैरीचा ३५.४८ दलघमी आहे. गेल्यावर्षी याच काळात तोतलाडोह मध्ये २१०.७५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता.महापालिका आणि राज्यकर्त्यांमुळे फटकाशहराच्या पाणी टंचाईला महापालिकेबरोबरच राज्यकर्ते जबाबदार आहे. मध्य प्रदेश सरकार हक्काचे पाणी अडविण्यासाठी चौराई धरण बांधत होते. हे सर्वांना माहीत होते. १९ मार्च १९९७ ला एक करार झाला होता. त्यात महापालिकेने शहराच्या पाण्यासाठी स्वतंत्र सोर्स तयार करायचा होता. तसे हमीपत्रही दिले होते. पण २२ वर्षात शहराच्या पाण्यासाठी एकही धरण बांधले नाही. विशेष म्हणजे करारानुसार पिण्याच्या पाण्यासाठी पेंचमधून फक्त १५ टक्के पाणी घ्यायचे आहे. पण महापालिकेने गेल्या वर्षी अतिरिक्त पाणी साठा वापरला. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले असते, महापालिकेने पाण्यासाठी दुर्लक्ष केले नसते तर शहरावर पाणी टंचाई वेळ आली नसती.अ‍ॅड. आशिष जैस्वाल, नेते, शिवसेनाजिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठाप्रकल्प                   प्रकल्पाची क्षमता               टक्केवारी           उपयुक्त पाणीसाठातोतलाडोह                १०१६.८८ (दलघमी)       २.३०                      ००कामठी खैरी              १४१.७४ (दलघमी)         २७.९०                ३५.४८रामटेक                     १०३ (दलघमी)                १५.६५               १४.३६नांद                           ५३ (दलघमी)                 ७६.६१                ३१.२४वेणा                            १३५ (दलघमी)              ७६.६१               १००.४९१३ मध्यम प्रकल्प        २००.०६ (दलघमी)          ५४.४५               ९९.६४

विभागातील धरणे ३५.२० टक्के भरली 

 गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाल्याने धरणांमधील साठाही वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (१६ ऑगस्ट) ३५.२० टक्के भरली आहेत. मोठ्या धरणांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत.  नागपूर विभागात  १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ३५५३.४९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला १२५०.७२ दलघमी (३५.२० टक्के ) इतकी भरली आहेत. तीन धरणे सोडली तर इतर धरणांमध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह २.३२ टक्के, कामठी खैरी २७.९० टक्के, रामटेक १६.१२ टक्के, लोवर नांद ६८.६८ टक्के, वडगाव ७६.६१ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ७५.८५ टक्के, सिरपूर ४८.४४, पूजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ४७.४६ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-(२)  २१.३८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २८.८५ टक्के, धाम ७३.०८, लोअर वर्धा ३६.४९ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द ४६.५७ टक्के भरले आहेत. 

 मध्यम तलावही ६२.७६ टक्के भरलीमोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत विभागातील मध्यम स्वरुपातील तलाव ६२.७६ टकके भरली आहेत. विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ३३७.४० दलघमी म्हणजेच ६२.७६ टक्के इतके पाणी साठले आहेत. 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर