शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पाकला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे

By admin | Updated: May 26, 2015 02:26 IST

देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय

पर्रीकरांच्या वक्तव्याचे संघाकडून समर्थन : मसरत आलमसंदर्भातील चर्चा वायफळनागपूर : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दहशतवाद्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. या विधानावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पर्रीकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानला समजेल अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.संरक्षणमंत्र्यांनी केलेले वक्तव्य काहीच चुकीचे नाही. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांचा वापर करून भारतामध्ये अस्थिरता व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. चर्चेची भाषा जर पाकिस्तानला समजत नसेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे असे संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुण कुमार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटले. पाकिस्तानमधील बलुचिस्तान, सिंध येथे मोठा आक्रोश आहे व याचीच परिणिती तेथे अंतर्गत संघर्ष व दहशतवादी हल्ल्यांत होते. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रवृत्तीला त्याच प्रकारे उत्तर देणाऱ्यांचे समर्थन करणे हे भारताच्या फायद्याचेच आहे असे सूचक विधान त्यांनी केले.मनोहर पर्रीकर काय म्हणाले?अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरेक्यांचा वापर करण्यात गैर काय, असा स्पष्ट सवाल खुद्द देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला होता. देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अतिरेक्यांबाबतच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. मसरत आलमला महत्त्व नकोआपल्या देशात अनेक गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते व आवश्यक बाबी मागे पडतात. भारताच्या विरोधात घोषणा देणारा फुटीरवादी नेता मसरत आलमवर प्रसारमाध्यमांत मोठी चर्चा होते. परंतु मुळात हा मसरत आलम आहे तरी कोण? याच्याबाबत माहिती तरी कोणाला होती? त्याच्यासारख्या व्यक्तीची चर्चा करण्याची गरजच नाही. याउलट चीनच्या सीमेवर जास्त सोयीसुविधा निर्माण करायला हव्यात. सीमेवरील गावांचा विकास करुन तिथपर्यंत रस्ते न्यायला हवे. मोदी सरकारने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे व त्यांची दिशा योग्य आहे असे अरुण कुमार म्हणाले.