शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:20 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपेंच प्रकल्प लाभ क्षेत्राला लाभ : तीन टप्प्यात होणार कामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तीन भागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील शासकीय परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. जलसंपदा विभागामार्फत प्रस्तावित योजनांमधून २६,३७० हेक्टर क्षेत्र १८८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे पुनर्स्थापित होणार आहे.चौराई धरणामुळे पेंच जलविद्युत प्रकल्प आणि तोतलाडोह या प्रकल्पात येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. या दुष्काळ निवारण कार्यक्रमाच्या भाग १ मध्ये वेस्टर्न कोलफिल्डसमधील खाणीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. वेकोलिच्या इंदर व कामठी खाणीतील १८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे २१६० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे. गोंडेगाव खाणीतून १० दलघमी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून १२०० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे.पेंच लाभ क्षेत्राातील प्रस्तावित सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४०१० हेक्टर क्षेत्रावरील वितरण प्रणालीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी ७ योजना भाग १ मध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मौदा येथील बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाºयावरून मौदा शाखा कालव्यात उपसाद्वारे सिंचनासाठी १८ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ चाचेर व बेलडोंगरीच्या खाली नवीन बंधारा बांधून २२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे. सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधून सी उपशाखा कालव्यात उपसाद्वारे १५ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे.सूर नदीवर भोसा-खमारी तसेच कोदामेंढी, इदोरा गावाजवळ नवीन बंधारा बांधून काटी जंक्शन कालव्यास उपसाद्वारे १९ दलघमी पाणी वापरता येणार आहे. कन्हान नदीवरील माथनी येथील जुन्या पुलास ब्रिज कम बंधारा करून तेथून पाणी उपसा सिंचन योजनाद्वारे मौदा शाखा कालव्यात सोडून सिंचनासाठी २६ दलघमी पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान नदीवरील पाणी पेंच उजव्या कालव्याच्या साक्रकिमी २२ वरील जलसेतू जवळ बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे ४० दलघमी पाणी सोडले जाणार आहे. सिहोरा येथे कन्हान नदीवर बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे २० दलघमी पाण्याचा वापर करता येणार आहे.भाग २ मध्ये भाग १ अंतर्गत ७ योजना, उपसा सिचन योजनेवर दाबयुक्त बंदिस्त पाईप वितरण प्रणालीद्वारे सिंचन व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. भाग ३ मध्ये पेंच प्रकल्पाअंतर्गत उजवा व डावा मुख्य कालव्याचे क्षतिग्रस्त अस्तरीकरण तसेच वितरण प्रणालीवरील बांधकामे दुरुस्ती करून कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी