शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:20 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपेंच प्रकल्प लाभ क्षेत्राला लाभ : तीन टप्प्यात होणार कामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तीन भागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील शासकीय परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. जलसंपदा विभागामार्फत प्रस्तावित योजनांमधून २६,३७० हेक्टर क्षेत्र १८८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे पुनर्स्थापित होणार आहे.चौराई धरणामुळे पेंच जलविद्युत प्रकल्प आणि तोतलाडोह या प्रकल्पात येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. या दुष्काळ निवारण कार्यक्रमाच्या भाग १ मध्ये वेस्टर्न कोलफिल्डसमधील खाणीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. वेकोलिच्या इंदर व कामठी खाणीतील १८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे २१६० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे. गोंडेगाव खाणीतून १० दलघमी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून १२०० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे.पेंच लाभ क्षेत्राातील प्रस्तावित सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४०१० हेक्टर क्षेत्रावरील वितरण प्रणालीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी ७ योजना भाग १ मध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मौदा येथील बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाºयावरून मौदा शाखा कालव्यात उपसाद्वारे सिंचनासाठी १८ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ चाचेर व बेलडोंगरीच्या खाली नवीन बंधारा बांधून २२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे. सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधून सी उपशाखा कालव्यात उपसाद्वारे १५ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे.सूर नदीवर भोसा-खमारी तसेच कोदामेंढी, इदोरा गावाजवळ नवीन बंधारा बांधून काटी जंक्शन कालव्यास उपसाद्वारे १९ दलघमी पाणी वापरता येणार आहे. कन्हान नदीवरील माथनी येथील जुन्या पुलास ब्रिज कम बंधारा करून तेथून पाणी उपसा सिंचन योजनाद्वारे मौदा शाखा कालव्यात सोडून सिंचनासाठी २६ दलघमी पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान नदीवरील पाणी पेंच उजव्या कालव्याच्या साक्रकिमी २२ वरील जलसेतू जवळ बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे ४० दलघमी पाणी सोडले जाणार आहे. सिहोरा येथे कन्हान नदीवर बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे २० दलघमी पाण्याचा वापर करता येणार आहे.भाग २ मध्ये भाग १ अंतर्गत ७ योजना, उपसा सिचन योजनेवर दाबयुक्त बंदिस्त पाईप वितरण प्रणालीद्वारे सिंचन व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. भाग ३ मध्ये पेंच प्रकल्पाअंतर्गत उजवा व डावा मुख्य कालव्याचे क्षतिग्रस्त अस्तरीकरण तसेच वितरण प्रणालीवरील बांधकामे दुरुस्ती करून कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी