शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:20 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देपेंच प्रकल्प लाभ क्षेत्राला लाभ : तीन टप्प्यात होणार कामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात व सिंचनातही घट निर्माण झाली आहे. पाणीसाठ्यात झालेल्या घटीमुळे पेंच लाभ क्षेत्रात निर्माण होणाऱ्या दुष्काळाचा सामना करता यावा म्हणून शासनाने १०१५ कोटींच्या दुष्काळ निवारण कार्यक्रमाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. तीन भागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील शासकीय परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. जलसंपदा विभागामार्फत प्रस्तावित योजनांमधून २६,३७० हेक्टर क्षेत्र १८८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे पुनर्स्थापित होणार आहे.चौराई धरणामुळे पेंच जलविद्युत प्रकल्प आणि तोतलाडोह या प्रकल्पात येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. या दुष्काळ निवारण कार्यक्रमाच्या भाग १ मध्ये वेस्टर्न कोलफिल्डसमधील खाणीच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. वेकोलिच्या इंदर व कामठी खाणीतील १८ दशलक्ष घनमीटर पाण्यामुळे २१६० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे. गोंडेगाव खाणीतून १० दलघमी पाणी उपलब्ध होणार असून त्यातून १२०० हेक्टर शेती पुनर्स्थापित होणार आहे.पेंच लाभ क्षेत्राातील प्रस्तावित सर्व उपसा सिंचन योजनेखालील १४०१० हेक्टर क्षेत्रावरील वितरण प्रणालीला सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यासाठी ७ योजना भाग १ मध्ये प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. मौदा येथील बाबदेव साखर कारखान्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधाºयावरून मौदा शाखा कालव्यात उपसाद्वारे सिंचनासाठी १८ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे. सांड नाल्यावर निमखेडा गावाजवळ चाचेर व बेलडोंगरीच्या खाली नवीन बंधारा बांधून २२ दलघमी पाणी वापरले जाणार आहे. सूर नदीवर अरोली गावाजवळ तसेच खंडाळा गावाजवळ नवीन बंधारा बांधून सी उपशाखा कालव्यात उपसाद्वारे १५ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे.सूर नदीवर भोसा-खमारी तसेच कोदामेंढी, इदोरा गावाजवळ नवीन बंधारा बांधून काटी जंक्शन कालव्यास उपसाद्वारे १९ दलघमी पाणी वापरता येणार आहे. कन्हान नदीवरील माथनी येथील जुन्या पुलास ब्रिज कम बंधारा करून तेथून पाणी उपसा सिंचन योजनाद्वारे मौदा शाखा कालव्यात सोडून सिंचनासाठी २६ दलघमी पाण्याचा वापर केला जाणार आहे.कन्हान नदीवरील पाणी पेंच उजव्या कालव्याच्या साक्रकिमी २२ वरील जलसेतू जवळ बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे ४० दलघमी पाणी सोडले जाणार आहे. सिहोरा येथे कन्हान नदीवर बंधारा बांधून कालव्यात उपसाद्वारे २० दलघमी पाण्याचा वापर करता येणार आहे.भाग २ मध्ये भाग १ अंतर्गत ७ योजना, उपसा सिचन योजनेवर दाबयुक्त बंदिस्त पाईप वितरण प्रणालीद्वारे सिंचन व्यवस्थेची निर्मिती केली जात आहे. भाग ३ मध्ये पेंच प्रकल्पाअंतर्गत उजवा व डावा मुख्य कालव्याचे क्षतिग्रस्त अस्तरीकरण तसेच वितरण प्रणालीवरील बांधकामे दुरुस्ती करून कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी