शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीमुळे ५०० कोटींचा फटका

By admin | Updated: May 25, 2015 03:04 IST

राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी)लागू केला. आता तो आॅगस्ट महिन्यात रद्द करण्याची घोषणा केली आहे.

महापालिका : शहरातील विकास कामांवर परिणामनागपूर : राज्य सरकारने १ एप्रिल २०१३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी)लागू केला. आता तो आॅगस्ट महिन्यात रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंतु या अडीच वर्षांच्या कालावधीत एलबीटीमुळे उत्पन्न घटल्याने महापालिकेला ५०० कोटींचा फटका बसला आहे. एलबीटीमुळे व्यापाऱ्यांना कर भरणे सोयीचे होईल. जकातीइतकेच उत्पन्न यातून प्राप्त होईल. करचोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. २०१३-१४ या वर्षात एलबीटीपासून ५४० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना प्रत्यक्षात २९५.७५ कोटींचा महसूल जमा झाला. २०१४-१५ या वर्षात ४२५ कोटींचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्षात ३०० कोटींचाच आकडा पार करता आला. एलबीटी लागू होण्यापूर्वी जकातीच्या उत्पन्नात दरवर्षी ७० ते ७५ कोटींनी वाढ होत होती. २०१०-११ या वर्षात जकातीपासून ३६२.७८ कोटी तर २०११-१२ या वर्षात ४३७.४२ कोटींचे उत्पन्न झाले होते. जकात कायम असती तर आज ६०० कोटींचा आकडा पार केला असता. महापालिकेच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. परंतु या जबाबदारीचे निर्वहन करताना उत्पन्नाची साधने, वसुली व नवीन कराधान, अंगभूत कार्यक्षमता यात विशेष अशी वाढ होत नसल्याचे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१४-१५ चा सुधारित व २०१५-१६ चा प्रस्तावित अर्थसंकल्प मांडताना व्यक्त केले होते. त्यातच आॅगस्ट महिन्यात एलबीटी रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्याने उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्यातच एलबीटीला पर्याय दिला नसल्याने पुढील वर्षात ५०० कोटींचे उद्दिष्ट गाठणे अवघड जाणार आहे.मनपाला दर महिन्याला आस्थापनेवर ६५ कोटींचा खर्च करावा लागतो. एलबीटीमुळे हा खर्च करताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)सरकारकडून मदतीची गरजमनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यासाठी पैसे नाही. कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकीत आहेत. विकास कामे रखडली आहेत. उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची गरज आहे. केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने मदत होईल, अशी पदाधिकारी व प्रशासनाला आशा आहे.