शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसईचे ३७,५०० विद्यार्थी परीक्षा न देता होणार पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST

दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने केल्या रद्द : पालकांच्या संमिश्र प्रतिक्रीया नागपूर : देशभरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्रीय ...

दहावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाने केल्या रद्द : पालकांच्या संमिश्र प्रतिक्रीया

नागपूर : देशभरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता केंद्रीय शिक्षा बोर्ड (सीबीएसई) ने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात पदोन्नती मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात किमान ३७,५०० च्या जवळपास सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

नागपुरात असलेल्या सीबीएसईच्या शाळांनी विशेष म्हणजे नियमित ऑनलाइन वर्ग घेतले. दहावीच्या विद्यार्थ्यांची तयारी सत्र सुरू होण्यापूर्वीच करून घेतली. शाळेच्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा देखील घेण्यात आल्या. पण कोरोनामुळे बोर्डाला परीक्षा घेणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला.

- सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी - ३७,५०० (अंदाजे)

- सीबीएसईने मुलांच्या जीवाला महत्त्व देऊन चांगला निर्णय घेतला आहे. शाळांनी यंदा ऑनलाइन क्लासेस घेतले, परीक्षाही घेतल्या. त्याच आधारवर विद्यार्थ्यांचे इंटरनल असेसमेंट करून गुण द्यायचे आहे. शिवाय पुढच्या वर्गात प्रवेशासाठी सुद्धा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून बोर्ड काही गोष्टी शिथिल करतील, अशी अपेक्षा आहे.

दीपाली डबली, शिक्षिका

- ऑनलाइन पर्याय होता

वर्षभर शाळांनी मुलांना ऑनलाइन शिकविले. ऑनलाइन परीक्षा सुद्धा घेतल्या. त्याच धर्तीवर बोर्डाने ऑनलाइन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात घेता आल्या असत्या. परीक्षेच्या आयोजनात टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवा होता. कारण मुलांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन व्हायला हवे होते.

योगेश पाथरे, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन

- मुलांनी अभ्यास केल्यामुळे त्यांना वाईट वाटते. पण पालक म्हणून अशा परिस्थितीत मुलांची काळजीही महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य आहे. फक्त भविष्यात त्यांची दहावीची मार्कलिस्ट बघून करीअरच्या दृष्टिकोनातून बाधा यायला नको.

सुरेखा अग्रवाल, पालक

- मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य आहे. पण शाळांनी जसे वर्षभर वर्ग घेतले, परीक्षाही घेतल्या. त्या माध्यमातून घेता आल्या असता, याचा विचार व्हायला हवा होता.

संजय बन्सोड, पालक