शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

देशात मागील तीन वर्षांत रेल्वे ट्रॅकवर ३२ हजार जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशभरातील मागील तीन वर्षांत वन्यजीवांचा रेल्वे ट्रॅकवर झालेला मृत्यूचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशभरातील मागील तीन वर्षांत वन्यजीवांचा रेल्वे ट्रॅकवर झालेला मृत्यूचा आकडा डोळे विस्फारायला लावणारा आहे. मागील तीन वर्षांतील हा आकडा ३२ हजारांच्या घरात असून, यात वाघ, सिंह, बिबट यासह अस्वले, हरिण, गवे, मोर यासारख्या अनेक प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा समावेश आहे. चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हा विषय आता अधिकच गंभीर ठरायला लागला आहे.

२०१९ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सभागृहात एका प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत गुरेढोरे, सिंह वाघ आणि बिबट्यांसह ३२ हजारांपेक्षा जास्त प्राणी रेल्वे ट्रॅकवर अपघातात मृत झाले. विशेष म्हणजे यात आसाम, ओरिसासह अन्य राज्यांत हत्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. आतापर्यंत ६० आणि यावर्षी जून २०२० पर्यंत पाच हत्ती ठार झाल्याची नोंद रेल्वे विभागाकडे आहे.

मागील काही वर्षांत वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वेचे जाळे वाढत आहे. कमी खर्चात, जलदगतीने आणि जंगलातून जाणाऱ्या कमी अंतराच्या रेल्वेचे जाळे विस्तारत आहे. मागील काळात गोंदिया-वडसा-चंद्रपूर हा रेल्वेमार्ग तयार झाला. चंद्रपूर ते गोंदिया हा नॅरोगेज ब्रॉडगेज झाला. अमरावती-मेळघाट हा नॅरोगेजही ब्रॉडगेज होत आहे. नागपूर-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्गही जंगलातून जाणार आहे. या नव्याने होणाऱ्या मार्गांवर असलेल्या वनक्षेत्रातून रेल्वे जाताना या ठिकाणी खबरदारी घेतली जावी, वेगमर्यादा कमी असावी, रुळावर खाद्यपदार्थ फेकू नये, रुळावर वन्यजीव असल्यास तशी सूचना देणारी अत्याधुनिक सूचना यंत्रणा लावणे रेल्वेला बंधनकारक केले जावे, वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आपण यापूर्वीच केल्याचे ग्रीन प्लानेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. रेल्वे प्रशासनासह राज्य, केंद्रीय वन्यजीव विभाग, व्याघ्र प्राधिकरण यांच्याकडेही ही मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया देताना वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे महाराष्ट्र समन्वयक प्रफुल्ल भांबूरकर म्हणाले, रेल्वे रुळावरील वन्यजीव मृत्यूंची संख्या गंभीर रेल्वेने जंगलातून जाणाऱ्या सर्व मार्गांसाठी दर कि.मी. अंतरात अंडरपास द्यावे, मार्गाला जाळीचे कुंपण केले जावे, रात्री व दिवसा ताशी गती निर्धारित केली जावी. लाइन कन्वर्शन होताना याची खबरदारी रेल्वेने घ्यावी. तसा पत्रव्यवहार होऊनही रेल्वे खाते मात्र गंभीर नाही, त्याचा हा परिणाम आहे.

...

रेल्वे ट्रॅकवरील प्राणी मृत्यूची आकडेवारी

वर्ष : प्राणी

२०१६ : ७,९४५

२०१७ : ११,६८३

२०१८ : १२,६२५

२०१९ : ३,४७९

...

चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्ग ठरतोय संवेदनशील

चंद्रपूर-गोंदिया हा रेल्वे मार्ग अलीकडे या बाबतीत संवेदनशील ठरायला लागला आहे. या रेल्वे मार्गावर दोन दिवसांपूर्वी वाघाचे बछडे मारले गेले. यापूर्वी चंद्रपूरजवळ २०१३ मध्ये २ आणि २०१८ मध्ये वाघांचे ३ बछडे चिरडले गेले. गवे, बिबट, हरिण आणि अनेक लहान वन्यजीव रोज कुठे ना कुठे चिरडले जातात. तक्रारी करूनही रेल्वे आणि वन्यजीव विभाग फारसे गंभीर दिसत नाही.

...