शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

१७ तासात ३ खून

By admin | Updated: May 26, 2015 02:31 IST

रविवार रात्री ८ ते सोमवार दुपारी १ या १७ तासात उपराजधानीत खुनाच्या ३ घटना घडल्या तर, एकाचा खून करण्याचा

गुन्हेगार शिरजोर : पोलीस हतबल : रस्त्यावर खुनाचा सडा नागपूर : रविवार रात्री ८ ते सोमवार दुपारी १ या १७ तासात उपराजधानीत खुनाच्या ३ घटना घडल्या तर, एकाचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या घटनांमुळे उपराजधानीतील गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले. हतबल पोलिसांमुळे उपराजधानीच्या रस्त्यावर खुनाचा सडा पडत आहे. नातेवाईक उठला जीवावर सक्करदऱ्यात सय्यद सलीम सय्यद खलील (वय ३४) या वाहनचालकाचा सोमवारी ८ च्या सुमारास भीषण खून झाला. शेख मुबारक शेख हयात (वय २५) या आरोपीसोबत सलीमचा वाद होता. एक मिनार मशीदजवळच्या बरेली शरीफ किराणा स्टोर्सजवळ सोमवारी रात्री सलीम बसून होता. आरोपी मुबारक शेख आपल्या साथीदारांसह तेथे आला. मुबारकने सलीमच्या मानेवर, गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला घटनास्थळीच ठार मारले. सक्करदरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. काही वेळेतच आरोपी मुबारक पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून त्याचा आज कोर्टातून २८ मेपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. व्यसनाने केला घात खुनाची तिसरी घटना नंदनवनमधीलच डायमंडनगरात सोमवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. संदीप जागेश्वर चौधरी (वय ३२) हा पेंटिंगचे काम करायचा. त्याला दारूचे भारी व्यसन होते. त्यामुळे तो अनेकदा कामावरही जात नव्हता. संदीपची सुरेश मंचलवारसोबत मैत्री होती. ते नेहमीच संदीपच्या घरात बसून दारू प्यायचे. सोमवारी सकाळी ११.३० ला ते नेहमीप्रमाने संदीपच्या घरात दारू पीत बसले. यावेळी आरोपी सुरेशने संदीपला शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे संदीपची पत्नी कल्पना हिने दोघांनाही फटकारले. भांडण करायचे असेल तर यापुढे घरात यायचे नाही, अशीही ताकीद दिली. त्यानंतर ती धुण्याभांडीच्या कामाला निघून गेली. दुपारी १.३० वाजता ती परत आली. त्यावेळी मुले आनंद (वय ५ वर्षे) आणि श्रावणी (वय दीड वर्षे) अंगणात खेळत होते. दाराची कडी लावून होती. दार उघडताच घरात संदीपचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. कल्पनाने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नंदनवन पोलिसांनाही सांगितले. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. आरोपी मंचलवारने संदीपच्या छातीवर गुप्तीचे घाव घातल्यामुळे संदीपचा मृत्यू झाला. कल्पनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश मंचलवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.नंदनवनमध्ये मित्राने केला घात सक्करदऱ्यातील खुनाच्या घटनेची चर्चा गरम असतानाच अशोक तुळशीराम उंबरकर (वय २७) याचा आकाश मंडल (वय २२) आणि चेतन मंडल (वय २०) या दोन भावांनी निर्घृण खून केला. मृत अशोक खरबीतील शक्तिमातानगरात राहत होता. तो तवेरावर चालक होता तर, आरोपी आकाश आणि त्याचा भाऊ चेतन मंडल हिवरी लेआऊटमध्ये जयभीम चौकाजवळ राहतात. ते कधी आॅटो तर कधी भाड्याचे वाहन चालवतात. तिघांनाही दारूचे व्यसन आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत ते सोबत दारू पीत होते. त्यानंतर मंडल बंधूंना घरी सोडण्यासाठी अशोकने त्यांना स्वत:च्या मोटरसायकलवर बसवले. ते तिघे मंडलच्या घरासमोर आले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तो टोकाला गेला. अशोकने घाणेरड्या शिव्या दिल्यामुळे चिडलेल्या आरोपीने अशोकच्या डोक्यावर दगडाने ठेचले. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. काही वेळेतच अशोकचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह आणि त्याची मोटरसायकल सेंट झेव्हियर स्कूलसमोरच्या फुटपाथजवळ आणून टाकली. अपघात वाटावा म्हणून आरोपींनी अशोकच्या अंगावर मोटरसायकल टाकली आणि घरी गेले. तेथे त्यांनी रस्त्यावर पडलेल्या रक्ताचे थारोळे धुवून काढले. सकाळी ७ च्या सुमारास परिसरातील मंडळींना अशोकचा मृतदेह पडून दिसला. त्याचा अपघात झाला, अशी चर्चाही पसरली. माहिती मिळाल्यानंतर नंदनवनचा पोलीस ताफा धडकला. एकाने अशोकचा मृत्यू अपघात नसून खून आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी मंडल बंधूंना अटक केली. (प्रतिनिधी)