शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची वर्क आॅर्डर, भाजपाचे हात वर

By admin | Updated: June 5, 2015 01:31 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे.

यवतमाळ : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (‘पीएमजीएसवाय’) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना सलग चालविली. २०१४च्या लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने या योजनेत महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या कामांचे आदेश जारी केले. त्यामुळे राज्यात रस्ते व पुलांच्या निर्मितीची कामे सुरू झाली. मात्र, बहुतांश कामे अर्ध्यावर आली असताना या कामांवर निधीची तरतूदच झालेली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यातील ८०० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांचीच देयके मिळत नसल्याने अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे या परिमंडळातील ६००वर उर्वरित कंत्राटदारांनी २ हजार २०० कोटींची कामे अर्ध्यावरच थांबविली आहे. ही कामे केवळ ३० ते ३५ टक्के झाल्याचे सांगितले जाते. देयके थकलेल्या कंत्राटदारांंनी राज्यातील भाजपाच्या काही खासदार-आमदारांशी चर्चा केली असता ‘काँग्रेस आघाडी सरकारमधील तरतुदीशिवाय निघालेल्या दोन हजार कोटींच्या वर्क आॅर्डरची जबाबदारी भाजपाने का घ्यावी? असा प्रतिप्रश्न त्यांना केला गेला. त्यानंतर या कंत्राटदारांच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी १ जून रोजी थेट दिल्ली गाठून अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्रसिंह चौधरी यांची भेट घेतली. ‘पीएमजीएसवाय’च्या या दोन हजार कोटी रुपयांसाठी ग्रामीण विकास मंत्रालयाला नाबार्ड, जागतिक बँकेकडून तीन प्रकारचे कर्ज घ्यावे लागणार असून भाजप सरकार तयार नसल्याची माहिती पुढे आली. याबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या भेटी घेतल्या. मात्र यातूनही कंत्राटदारांना दिलासा मिळाला नाही. थकीत देयके तत्काळ देण्याच्यादृष्टीने शासनस्तरावर वरिष्ठांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पीएमजीएसवायच्या अमरावती परिमंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता ए.सी. अडचुले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केंद्रातील ‘पीएमजीएसवाय’च्या धर्तीवर राज्यात ‘सीएमजीएसवाय’ अर्थात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विचाराधीन आहे. ‘पीएमजीएसवाय’चीच आर्थिक सोय नसताना राज्य सरकारने ‘सीएमजीएसवाय’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नाही, त्याचे नियोजनही पूर्ण झालेले नाही. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली. हा निधी शासनाच्या तिजोरीत आरक्षित होऊन पडून आहे. राज्यात अर्धवट असलेल्या रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी तात्पुरता का होईना ‘पीएमजीएसवाय’मध्ये हा निधी वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ५० कोटी देण्याची तयारीवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कंत्राटदार भेटले असता ‘पीएमजीएसवाय’ ही केंद्र शासनाची योजना असल्याने केंद्रानेच त्यासाठी पैसे द्यावे, अशी भूमिका घेऊन शेवटी केवळ ५० कोटी रुपये देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.