शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रपूजा हवी कशाला?

By admin | Updated: October 25, 2015 01:40 IST

देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत.

नागपूर : देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. या स्थितीत जेव्हा शस्त्राची पूजा केली जाते तेव्हा लोकांनी शस्त्र वापरावे, असा संदेश जातो. त्यातून हिंसक प्रवृत्ती वाढते. क्रूरता वाढते. तेव्हा शस्त्रपूजेची आवश्यकता काय? यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) देशात अराजकतेला आमंत्रण द्यायचे आहे का? असा थेट सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन चिमुकली मुले जाळण्यात आली. ते या शस्त्रपूजेचेच प्रतीक आहेत. जोपर्यंत शस्त्रपूजा सुरू राहील, तोपर्यंत देशात हिंसकवृत्ती जोपासली जाईल. ही हिंसकवृत्ती काही प्रमाणात मुस्लिमांंच्या विरोधात गोहत्येच्या रूपात वापरली जाते तर दलितांच्या विरोधात क्रूरतेने वापरली जाते. शस्त्रपूजेचे परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्वत:च्या रक्षणासाठी त्यांनाही शस्त्राची गरज वाटू लागली आहे. शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा म्हणून माझ्याकडे मागील महिनाभरात तब्बल ४० अर्ज आले आहेत. आरएसएस आतापर्यंत काय करत होता, हे महत्त्वाचे नाही. परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात आरएसएसप्रणीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे व वागणे हे शांततेचेच असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार्वाकापासून ते तुकारामापर्यंत यांनीसुद्धा धर्म सांगितला आहे. परंतु त्यात शस्त्राची पूजा कुठेही सांगितलेली नाही. काही राजघराण्यात शस्त्रपूजा केली जाते. परंतु ती शस्त्रपूजा ही व्यक्तिगत बाब असते. मनुवादी जातीव्यवस्थेचा विचार केला तर अवजारांची पूजा केली जाते. परंतु ती त्यांच्या रोजच्या वापराची असतात. ती शस्त्रे नाहीत. तसेच जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना तर कुठलेही शस्त्र वापरण्याची परवानगीच नाही. इतिहासात अशोक विजयादशमीचा दिवस आहे. त्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्रे खाली टाकली होती. म्हणजेच तो दिवस हिंसा त्यागण्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिकरीत्या शस्त्रपूजा का केली जात आहे, याचा खुलासा मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)आठवले-पासवान हे बुजगावणेवाजपेयी यांच्या काळात भाजपची पर्यायी घटना मी स्वत: सभागृहात उघड केली होती. याची जाणीव खा. रामदास आठवले, रामविलास पासवान आणि उदित राज यांना आहे. भाजपला घटना बदलवायची आहे, हे उघड असताना ते त्यांच्यासोबत आहेत. एखाद दुसऱ्या मुद्यावर ते विरोध करतात. तेव्हा सत्तेत राहायचे व विरोधात बोलायचे हे काही बरोबर नाही. धोरण पटत नसेल तर बाहेर पडा, बुजगावण्यासारखे राहू नका, असे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.