शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट

By admin | Updated: February 3, 2015 01:31 IST

मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ही घटना होऊन चार वर्षे उलटली आहेत़ यासाठी चार पोलीस अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे असताना या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे़ त्यामुळे यासाठी शासनाला दंड ठोठवायचा की नाही, हे पुढील सुनावणीला आम्ही जाहीर करू, असे न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़या प्रकरणी ईश्वर खंडेलवाल यांनी जनहित याचिका केली आहे़ २०११ मध्ये पवना धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ या निर्घृण घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार करण्यात आली़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेशही दिले़ तरीही कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयानेच या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली़ याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला दिले़ त्यानंतर या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश एम़ जी़ गायकवाड यांच्यामार्फत झाली़ पण यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे खंडेलवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले़ (प्रतिनिधी)