शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार वेगळे दोन हजार कोटी कुठले देणार?

By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST

सहकारमंत्र्यांचा पवित्रा : केंद्राने केलेली हीच राज्याची मदत

कोल्हापूर : केंद्र शासनाने साखर उद्योगाला सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज बुधवारी जाहीर केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यातील राज्याच्या वाट्याला १८५० कोटी रुपये मिळणार आहेत, त्यामुळे राज्य शासनाने वेगळे दोन हजार कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. त्यामुळे साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेतच; शिवाय राज्य सरकारचा हा ‘यू टर्न’ही वादाचा विषय बनण्याची चिन्हे आहेत.राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आल्याने त्यांना मदत करायची म्हणून राज्य शासनाच्यावतीने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन हजार कोटी रुपये कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही रक्कम जाहीर करूनही दिली नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्र्यांच्या येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. तेव्हाही सहकारमंत्र्यांनी ही रक्कम देण्याबाबत वित्त विभागाने काही त्रुटी काढल्या आहेत. त्यासंबंधीची चर्चा १० जूनला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून ३० जूनपूर्वी कारखान्यांना रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे खरे तर बुधवारी राज्याच्याच पॅकेजकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु, तोपर्यंत दुपारीच केंद्र शासनाने सहा हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज जाहीर केल्यावर राज्य शासनाने विधिमंडळात दिलेले आश्वासनही मागे घेतले.सायंकाळी सहकारमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘राज्य सरकारनेच केंद्र शासनाकडे कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी जे कर्ज जाहीर झाले, त्यापेक्षा वेगळे दोन हजार कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यात व केंद्रात वेगळे सरकार नाही. आमच्याच सरकारने केलेली ही मदत आहे.’गरज ६०० ची...मिळणार २०० रुपयेमहाराष्ट्राला केंद्र शासनाच्या पॅकेजमधून जी रक्कम मिळणार आहे, त्यातून कसेबसे टनास २०० रुपये उपलब्ध होतील. परंतु, ‘एफआरपी’ देण्यासाठी प्रत्यक्षात टनास ६०० रुपयांची तूट आहे. ही रक्कम कशी भरून काढणार आणि पुढील हंगाम कसा घेणार? या चिंतेत साखर कारखानदारी आहे. त्यात राज्य सरकारच्या नव्या पवित्र्यामुळे अडचणीत वाढ झाली.