शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीसाठी काय तयारी?

By admin | Updated: June 11, 2015 01:22 IST

पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे,

मुंबई : पुढच्या महिन्यातील आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी नेमकी काय तयारी केली आहे, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायायलाने बुधवारी राज्य शासनाला दिले.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. पुढच्या महिन्यात २७ जुलैला आषाढी आहे. तेव्हा संपूर्ण राज्यातून १५ लाखांहून अधिक वारकारी पंढरपुरात येतील. मात्र त्यांची राहण्याची व शौचालयाची सोय शासन योग्य प्रकारे करीत नाही. यामुळे भाविकांना स्वत:लाच राहण्याची व्यवस्था करावी लागते. अजूनही पंढरपूरमध्ये मानवाकडून मानवी विष्ठा उचलली जाते, असा आरोप करीत वारकरी संघटनेने उच्च न्यायालयात अर्ज केला. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी न्यायालयानेच शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. याचे प्रत्युत्तर सादर करताना मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी पंढरपूरमधील तयारीचा तपशील न्यायालयासमोर ठेवला. पंढरपुरात चार हजार मोबाइल शौचालये दिली आहेत. अजून सहा हजार दिली जाणार आहेत. वारकऱ्यांना राहण्यासाठी मंदिरापासून अंदाजे दीड किमी अंतरावर १५ एकरांचा भूखंड शासन ताब्यात घेणार आहे, असे अ‍ॅड. वग्यानी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)