शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांना पाच वर्षांपासून केंद्राप्रमाणे वेतनश्रेणीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 4, 2015 22:52 IST

औरंगाबाद खंडपीठाचा निकाल दूर्लक्षीत; वेतनश्रेणी समितीनेही केली नाही शिफारस.

राजेश शेगोकार/ बुलडाणा : मुख्याध्यापकांना केंद्र सरकारप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी यासाठी सातत्याने मागणी लावून धरण्यात आली. या मागणीची दखल न घेतल्याने मुख्याध्यापकांच्या संघटना न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने शिक्षक दिनीच, ५ सप्टेंबर २0११ रोजी केंद्र सरकारप्रमाणे वेतन देण्याबाबत सकारात्मक पुर्नविचार करावा, असे निर्देश राज्य शासनाला दिले; मात्र तब्बल पाच वर्ष होऊनही यासंदर्भात निर्णय होत नसल्याने मुख्याध्यापकांच्या संघटना आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सन २00६ मध्ये केंद्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू करून मुख्याध्यापकांना १५ हजार ६00 ते ३९ हजार १00 ही वेतनश्रेणी केंद्राने लागू केली. महाराष्ट्र शासनाने सहावा वेतन आयोग लागू करताना ९ हजार ३00 ते ३४ हजार ८00 वेतनश्रेणी व ४ हजार ८00 ग्रेड पे दिलेला आहे. केंद्र व राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या वेतनङ्म्रेणीतील ही तफावत दूर करण्यासाठी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ, तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्याने दिलेल्या या वेतनश्रेणीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर खंडपिठाने राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या बाजुने निकाल दिला. लवकरात लवकर मुख्याध्यापकांना केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी, याकरीता वेतन निश्‍चिती करणार्‍या समितीने सकारात्मक पुर्नविचार करावा, असे निर्देश खंडपिठाने राज्य शासनाला दिले होते. वेतनश्रेणी समितीची शिफारस आल्यानंतर शासन आदेश जारी होणार असून, याचा लाभ राज्यातील माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळा तसेच माध्यमिक आश्रमशाळांमधील १0 हजारांवर मुख्याध्यापकांना होणार आहे. १ जानेवारी २00६ पासून मुख्याध्यापकांना हा फरक मिळण्याची अपेक्षा होती; मात्र राज्य शासनाने दूर्लक्ष केल्याने आता न्यायालयाच्या निर्देशाचा अवमान केल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्याची तयारी मुख्याध्यापकांच्या महामंडळाने केली आहे.

           यासंदर्भात बुलडाणा जिल्हा मुख्याध्यापक संघटनचे अध्यक्ष रविंद्र वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे नमूद केले. वेतनङ्म्रेणीतील त्रुटी दूर करण्याची मागणी लावून धरत विकेंद्रीय मुल्यमापन पद्धतीमध्ये वर्ग १0 व १२ वीच्या उत्तरपत्रिका न स्विकारून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते; मात्र न्यायालयाच्या निर्देशाकडेही शासन दूर्लक्ष करीत असल्याने आता पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार आहेत. न्यायालयाने शिक्षकदिनी आमच्या बाजुने निकाल देऊन एकप्रकारे शिक्षकांच्या मागणीच सन्मान केला होता. शासनाने मात्र दखल घेतली नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.