शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पसरणीच्या दऱ्याखोऱ्यातला आवाज महाराष्ट्रात घुमला

By admin | Updated: March 21, 2015 00:13 IST

साताऱ्याचे साबळे : आईच्या ओव्या, वडिलांच्या भजनावर पोसला शाहिरी पिंड

राजीव मुळये - सातारा -‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,’ असे आरोळी देत मऱ्हाटी माणसाच्या कर्तृत्वाला साद घालणारे महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांचा पिंड आईकडून ऐकलेल्या जात्यावरील ओव्या आणि वडिलांकडून ऐकलेल्या भजनांवर पोसला. पसरणीच्या दरीखोऱ्यात घुमलेल्या या खड्या आवाजाचा प्रतिध्वनी हा महाराष्ट्राचा श्वास बनला.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कृष्णरावांना अंमळनेर या त्यांच्या आजोळी लहानपण व्यतीत करावे लागले, तेव्हाच त्यांच्या जीवनात मोठी उलथापालथ सुरू होती. एकीकडे परिस्थिती चटके देत होती, तर दुसरीकडे ‘उत्तम गाणारा तुझा नातू मला दे,’ अशी मागणी साक्षात गाडगेबाबा त्यांच्या आजीला करीत होते. सातवीची परीक्षा न देताच त्यांना पसरणीला परतावे लागले. अंगी असलेल्या कलागुणांचा वापर करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. फलटण येथील त्यांच्या कार्यक्रमाने प्रभावित होऊन वकील बारसोडे यांची मुलगी भानुमती शाहिरांच्या प्रेमात पडली. १८ फेब्रुवारी १९४९ रोजी दोघांचा पसरणीत झालेला आंतरजातीय विवाह ही मोठी क्रांतिकारी घटना होती. सूनमुख प्रथम पाहणाऱ्या कृष्णरावांच्या वडिलांनी आपल्याकडील ज्ञानेश्वरी सुनेला भेट दिली. ‘चले जाव’ आंदोलन सुरू असताना गांधीजींचे मुंबईत झालेले भाषण, क्रांतिसिंह नाना पाटील यांची झालेली भेट, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्याने शाहीर साबळे यांचा वैचारिक पिंड घडला. तात्या टोपे, हुतात्मा बाबू गेनू, नाना पाटील, कर्मवीर यांचे पोवाडे शाहिरांनी लिहिले. याखेरीज निवडणुकीचा पोवाडाही त्यांनी लिहिला. या राजकीय पोवाड्यांबरोबरच चिनी आक्रमणावरील पोवाडा, कोयनेचा पोवाडा हे त्यांचे अन्य प्रसिद्ध पोवाडे होत. १९४५ ते १९७५ हा शाहीर साबळे यांच्या दृष्टीने सर्वाधिक निर्मितीक्षम कालखंड ठरला. इंद्राच्या दरबारात तमासगीर (१९४५), नारदाचा रिपोर्ट (१९५१), चित्रगुप्ताच्या दरबारात दारुड्या (१९५२), कोड्याची करामत (१९५३), कोयना स्वयंवर (१९५४), नशीब फुटके सांधून घ्या (१९५५), यमाच्या राज्यात एक रात्र (१९६०) ग्यानबाची मेख (१९६२), मीच तो बादशहा (१९६३), आबुरावचे लगीन (१९६३), आंधळं दळतंय (१९६७), असुनी खास मालक घरचा (१९६८), बापाचा बाप (१९७२), कशी काय वाट चुकला (१९७३) ही त्यांची गाजलेली मुक्तनाट्ये आणि वगनाट्ये होत. त्यांच्या नाट्यामधून कधी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कधी शोषणाविरुद्ध आवाज, कधी दैववादावर प्रहार तर कधी रिकामटेकडेपणावर मार्मिक भाष्य आढळून येते. महाराष्ट्रगीत प्रथम घुमले सोलापुरातशाहीर साबळे यांना ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकरांचीही शाबासकी लाभली. शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे, शाहीर शंकरराव निकम यांच्या कवनांनी साबळे यांना भुरळ घातली होती. शनिवार वाड्यावर शाहीर निकमांचा कार्यक्रम सुरू असताना ‘स्वराज्य दारी आले, आणा दीपक ज्योती’ हे गाणे म्हणण्याची संधी साबळे यांना मिळाली आणि तेथूनच त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत सोलापूरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत शाहिरांच्या मुखातून प्रथम बाहेर पडले आणि ते ‘महाराष्ट्र शाहीर’ झाले.पडेल ते काम केले‘शाहीर साबळे आणि पार्टी’ निर्माण होऊन पहिला कार्यक्रम सादर होताच त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु शाहिरांना प्रसिद्धीच्या झोतात येण्यास बराच कालखंड जावा लागला. तोपर्यंत कलेवर मनापासून प्रेम करत शाहिरांनी पडेल ते काम केले. मुंबईच्या स्वदेशी मिलमध्ये त्यांनी कामगार म्हणून काम केले. सरस्वती सिनेटोन या स्टुडिओत या मनस्वी कलावंतावर ‘वाद्यांची देखभाल’ हे काम सोपविण्यात आले होते.