शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्र्याला लागली बहार गळती!

By admin | Updated: August 23, 2014 00:28 IST

पावसाअभावी विदर्भातील फळपिकांना झळ पोहोचत असून, संत्र बहार गळती मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

अकोला : पावसाअभावी विदर्भातील फळपिकांना झळ पोहोचत असून, संत्र बहार गळती मोठय़ा प्रमाणात सुरू  झाल्याने संत्र उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. 
राज्यात सर्वाधिक 1 लाख 5क् हेक्टर संत्र फळपिकाचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु या वर्षी बदलत्या हवामानाने या फळ पिकाचे लागवड क्षेत्र वाढू शकले नाही. 2क्क्5 साली वरुणराजाची अशीच अवकृपा झाली आणि शेतक:यांवर संत्र झाडे तोडण्याची वेळ आली होती.
 त्यावर्षी जवळपास 4क् ते 5क् हजार हेक्टरवरील संत्र्याची झाडे तोडण्यात आली होती. यावर्षीही तेच चित्र असून पाऊस नसल्याने आद्र्रता नाही. याशिवाय भूजल पातळी घसरल्याने जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसून, तापमान वाढल्याने संत्र्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे अगोदरच डिंक्या रोगाचा सामना करणा:या संत्र्यावर मुळकूज (कोलॅटोट्रायकम) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहार गळती वाढली आहे. राज्यातील इतर फळपिकांची अवस्थाही जवळपास तशीच आहे. 
रोजगार हमी योजना व नंतर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ पिकांचे लागवड क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. 
राज्यात केळी 82 हजार हेक्टर क्षेत्रवर असून, द्राक्ष 9क् हजार हेक्टर, पेरू  39 हजार, आंबा 4.82 लाख, 
पपई 1क् हजार, लिंबूवर्गीय फळे 
2.77 लाख, डाळिंब 78 हजार, 
चिकु 73 हजार, तर इतर फळ पिकांनी 4.18 लाख हेक्टर क्षेत्र व्यापले
आहे; परंतु विविध रोगांचा सामना करणारा संत्र उत्पादक शेतकरी यंदा पाऊसच नसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यात शेतीच्या कर्जाचा विषयही  गंभीर आहे.  (प्रतिनिधी)
 
च्ज्या शेतक:याकडे विहीरी किंवा कूपनलिकांची व्यवस्था आहे, ते शेतकरी या पाण्यावर फळबागा कशाबशा टिकवून आहेत; तथापि पावसाअभावी या जलस्त्रोतांचीही पातळी खालावली आहे. विदर्भात सिंचन प्रकल्पांची कामे होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. 
 
पावसाअभावी भूजल पातळी घसरली असून, तापमानात वाढ झाली आहे. परिणामी संत्र्याचा बहार गळण्यास सुरुवात झाली आहे. विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
- डॉ. शरदराव निंबाळकर,
ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
 
विदर्भातील संत्र उत्पादक शेतकरी संत्र्यावर येणा:या डिंक्या रोगाचा सामना सतत करीत असतात़ तथापि या वेळी वातावरणात बदल झाला असून, पाऊस नसल्याने बुरशीजन्य कोलॅटोट्रायकम रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार औषधांची फवारणी करावी.
- डॉ. शामसुंदर माने, विभागप्रमुख (वनस्पतीरोग शास्त्र), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला