शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

“आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...”; कुणी व्यक्त केली खंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:24 IST

Union Minister Ramdas Athawale News: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही, असे मित्रपक्षातील नेत्यांनी म्हटले आहे.

Union Minister Ramdas Athawale News: एकीकडे बीड, परभणी, कृषी विभागातील घोटाळा, ईव्हीएम मशीन यांसारख्या विषयांवरून विरोधक महायुती सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महायुती मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. बड्या नेत्यांच्या भेटी गाठी वाढत चालल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती आणि मनसे युतीत असणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच महायुतीतील एका मित्रपक्षाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. विधानसभा निवडणुकीचे निकाल मागे टाकून आता पुढील महापालिका निवडणुकीच्या तयारीला राज ठाकरे लागले आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याबाबतचा आपला विरोध कायम ठेवला आहे. 

आम्हालाच महायुतीत काही मिळत नाही, आणखी राज ठाकरेंना घेतले तर...

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकदा भेटले ते ठीक. मात्र, त्यांना वारंवार भेटणे हे काही बरोबर नाही. राज ठाकरे यांना महायुतीत घेणे बरोबर नाही. त्यांचा महायुतीला काही फायदा होत नाही. ते आले तर आम्हाला काय मिळणार? मित्रपक्षांनी आम्हाला विचारात घेतले पाहिजे. आम्हाला आत्ताच काही मिळत नाही. राज ठाकरे आल्यावर काहीच मिळणार नाही. लोकसभेत त्यांचा काही फारसा फायदा आम्हाला झालेला नाही. राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत. त्यांना महायुतीबरोबर घ्यायचे वगैरे चर्चा सुरू आहेत. पण त्यांना घेऊ नये असे आमचे मत आहे. आम्ही असताना राज ठाकरेंची आवश्यकता नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाणे अयोग्य आहे असे नाही पण मला वाटते की, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही. महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.

दरम्यान, राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेला सुरुवात केली, तेव्हा शासनाच्या तिजोरीत निधी होता. आता तिजोरीतील पैसे संपत चालले आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना निकष लावण्यात येत आहेत, असे सांगत रामदास आठवले यांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला. तसेच महापालिकेच्या निवडणुका कधीही होतील. त्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांनी एकत्र निवडणूक लढावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये १० ते १२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आम्हाला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे. तसेच नवी महामंडळे स्थापन केली जातील, त्यातील तीन अध्यक्षपदे तरी आम्हाला मिळाली पाहिजेत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीMNSमनसे