शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण १०० टक्के भरले

By admin | Updated: October 1, 2016 23:48 IST

मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे

- सिध्देश्वर शिंदे/ आॅनलाईन लोकमतसोलापूर, दि.01 - मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावली़ शिवाय पुणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने यंदाच्या वर्षी १०० टक्केचा आकडा गाठला आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास उजनी धरण १००. 45 % टक्के झाल्याने शेतकरी, साखर कारखानदार, राजकारणी, नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.उजनी धरण यावर्षी आतापर्यंतची सर्वात निचांकी पातळीवर आले होते़ त्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस पडला नाही़ त्यामुळे यावर्षी उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये येणार की नाही याबद्दल शंका निर्माण करण्यात येत होती़ कारण उजनी मायनस ५३.५३ पर्यंत खाली आले होते़ त्यातच जुन-जुलै या महिन्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे ६० दिवसात केवळ उजनीत ३२ टक्के पाणी आले़ आॅगस्ट उजडला तरी उजनी मायनस २८ टक्के एवढीच होती़ मात्र आॅगस्टमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने ६ दिवसात म्हणजे ६ आॅगस्टला उजनी धरणाने मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला़.मृत साठ्यातील ५३ टक्के पाणीसाठा भरून निघण्यास तब्बल ६६ दिवस पावसाळ्याचे गेले़ ६ आॅगस्ट ते १ आॅक्टोबर या ५५ दिवसात उजनी धरणाने दोन टप्प्यात कधी वेगाने तर कधी संथगतीने उजनी धरण १०० टक्के झाले आहे..उजनी धरण २८ वेळा गाठली शंभरीउजनी धरण यावर्षी उशिरा का होईना १०० टक्के झाले आहे़ उजनी धरणाने त्याच्या इतिहासात ३६ वर्षात २८ वेळा शंभर टक्के भरले आहे़ त्यात सर्वात उशिरा २००९ साली १०० टक्के भरले़ तेही केवळ उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसावर कारण २००९ साली १९ धरणातून एक थेंबही पाणी उजनी धरणात आले नव्हते.

उजनी धरणाची पाणीपातळीएकूण पाणीपातळी : ४९६.८१० मीटरएकूण पाणीसाठा : ३३१३.३० द़ल़घ़मीउपयुक्त साठा : १६१०़४९ द़ल़घ़मीटक्केवारी : 100. 45 टक्केविसर्ग : दौंड : ५०४६ तर बंडगार्डनमधून ३२८० ने पाणी येत आहे.उजनीत ५००० अन जाते ३३००उजनी धरण गेल्या चार पाच दिवसापूर्वी १०० टक्के होण्याची अपेक्षा होती़ परंतू दौड येथुन उजनीत येणाऱ्या विसर्गात कमालीची घट झाल्याने दररोज केवळ अर्धा, पाव टक्के पाणी वाढत गेले़ कारण दौंड येथुन उजनीत ५००० क्युसेसने विसर्ग येत होता अन ते आजही येत आहे़ उजनी कालव्याव्दारे १५०० क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे़ त्यामुळे येणारे ५००० क्सुसेक तर जाणारे ३३०० म्हणजेच केवळ १७०० क्सुसेकने उजनी वाढत आहे.१२१ दिवसात १६३ टक्के पाणी झाले जमायावर्षी उजनी धरणात १२१ दिवसात १६३ टक्के पाणी म्हणजे १२३़६३ टीएमसी पाणी जमा झाले आहे़ उजनी मायनस ५३़५३ टक्के प्लस १०० टक्के पाणी उजनी धरणातून कालवा, बोगदा यातून ८़५० टीएमसी पाणी सोडले होते असे एकूण १२१ दिवसात १२५़६३ टीएमसी अर्थात १६३ टक्के पाणी जमा झाले आहे़ चार महिन्यात उजनी दररोज १ टीएमसी पाणी जमा झाले आहे.उजनीतून भीमेत पाणी सोडण्याची शक्यता येणारउजनी धरणाची शंभरी पूर्ण झाली आहे़ त्यात पावसाने सुरूवात केल्यामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के (१२३ टीएमसी) भरणार हे नक्की आहे़ त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.७ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवातउजनी धरणावरील १९ पैकी ४ धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे़ वडज ८३२, घोड ३०००, कलमोडी ३२०, भामा आसखेड २१०० तर शनिवारी दिवसभर पुणे परिसरातील ८ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. आंध्रा ५ मिमी, पवना ९ मिमी, कासारसाई ३० मीमी, मुळशी १३ मीमी, टेमघर २२ मीमी, वरसगांव १८ मीमी, पानशेत १५ मीमी एवढा पाऊस झाला आहे.