शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना लाज वाटून उपयोग काय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 5, 2015 10:09 IST

शेतक-यांच्या आत्महत्येवर औषध सापडत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लाज वाटते, पण त्याचा उपयोग काय असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ५ - शेतक-यांच्या आत्महत्येवर औषध सापडत नसल्याने मुख्यमंत्र्यांना लाज वाटते, पण त्याचा उपयोग काय असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाले असले तरी शेतक-यांची दुर्दशा संपलेली नाही असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे. 

मंगळवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांन भाजपावर निशाणा साधला. आता शिवसेनेने शेतक-यांच्या आत्महत्येवरुन सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी कष्ट करत असला तरी त्याला अपेक्षीत फळ मिळत नाही. सध्या लाटेवर व हवेवर निवडणुका जिंकता येतात आणि मंत्री, मुख्यमंत्री होता येते. पण शेतकर्‍यांना अशी लाट किंवा हवा जीवदान देऊ शकत नाही असा सणसणीत टोला त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीला नवी उंची मिळेल असा आशावाद व्यक्त करतानाच शेतक-यांच्या आत्महत्येने लाज वाटते असे विधान केले होते. यावरुन टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी आत्महत्या करणार नाही याची दक्षता घेणे हे सरकारचे कर्तव्य असते.  फक्त भाषणात लाज वाटून उपयोग नसून प्रत्यक्षात कृती करणे अधिक गरजेचे आहे असा चिमटाही त्यांनी काढला आहे.  विदर्भातील शेतक-यांशी संवाद घेणा-या राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात विदर्भातील शेतक-यांना जाहीर झालेला पॅकेज, यूपीए सरकारने दिलेली आश्वासनं याचा लेखाजोखा मांडावा असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.