शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; "ते राज्यात मुख्यमंत्री बनल्यापासून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 11:31 IST

१६ तारखेच्या कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.

मुंबई – महाराष्ट्रातलं वातावरण कधी नव्हे तेवढे असुरक्षित, अस्थिर, जातीजातीत वाद या सर्वाला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. ज्यादिवशी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीजातीत वाटला गेला. हा महाराष्ट्र सामाजिक, आर्थिकदृष्ट्या एकसंघ असावा यासाठी यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेकांचे कौशल्य होते. परंतु गेल्या १० वर्षात महाराष्ट्राचे जातीधर्मानुसार तुकडे पडतायेत असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारवर विश्वास नाही, हेच देवेंद्र फडणवीस बाहेरील राज्यात प्रचाराला चाललेत. त्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ हे बारामतीत जाऊन सांगितले होते. हेच देवेंद्र फडणवीस ज्यांनी मविआ काळात आमच्या हातात सत्ता आली तर २४ तासांत मराठ्यांना आरक्षण देऊ म्हटलं होते. मग का देत नाही? त्यामुळे जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? आरक्षणाचे फुलबाजे यांनीच उडवले मग आता विझले का? जरांगे पाटील यांनी समाजासाठी प्राण पणाला लावले आहेत. १६ तारखेच्या कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगरला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.

आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नाहीत

अजय अशर नावाच्या बिल्डरकडे चाव्या असतील. असे आरोप करणे, बोलणे यामुळे ५० खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाही. मुंबई, ठाण्यात सध्या बिल्डरांचे राज्य सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. यातून केलेली कमाई देशाबाहेर कशी जातेय आणि कोणत्या बिल्डरच्या माध्यमातून जातेय हेदेखील माहिती आहे. आम्हाला बदनाम करून तुमचे डाग धुतले जाणार नाहीत असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोपावर केले.

आमची लढाई सत्तेसाठी नसून...

इंडिया आघाडीच्या १४ नेत्यांची शरद पवारांच्या घरी बैठक आहे. आज बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जींना ईडीची नोटीस आली. हा रडीचा डाव आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने अभिषेक बॅनर्जींवर सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. हेमंत सोरेन यांच्यावर दबाव आहे. माझ्यावर दबाव आहे. परंतु आम्ही यातून काहीही झाले तरी या दबावापुढे झुकायचे नाही हेच प्रत्युत्तर आहे. अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे देशाला संदेश जाईल नेमकं काय झालंय. अभिषेक बॅनर्जी पोहचू नये म्हणून आज ईडीची नोटीस पाठवली. उद्या हेमंत सोरेन यांनाही येईल. आमची लढाई सत्तेसाठी नसून हुकुमशाही उलथवून लावण्यासाठी आहे. त्यामुळे अशा लढाईत वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवले जातात असंही संजय राऊत म्हणाले.

द्वेष पसरवण्याचे काम मोदींनेच केले

राहुल गांधी जे देशाची स्थिती आहे, सत्य आहे ते सांगतायेत, एका विद्यापीठाकडून राहुल गांधींना आमंत्रित केले होते. राहुल गांधींची मुलाखत भाजपा नेत्यांनी ऐकायला हवी. बाहेरच्या देशात जाऊन द्वेष पसरवण्याचे काम सर्वात आधी नरेंद्र मोदींनी सुरू केले. गेल्या ७० वर्षात काय झाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी बाहेर भाषणे कुणी केली त्यांनीच केली होती अशी टीका राऊतांनी केली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे