शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

उद्धव पुढे न आल्याने युती झाली नाही - राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

By admin | Published: October 09, 2014 12:02 PM

शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबत मी प्रयत्न केले होते मात्र उद्धवकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने युती होऊ शकली नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ९ - शिवसेना - भाजप युती तुटल्यावर शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल  उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर शिवसेना नेत्यांनी आमच्याशी संपर्कच न साधल्याने ही युती होऊ शकली नाही असा गौप्यस्फोट मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. त्यांच्या पोनची वाट पाहत आम्ही एबी फॉर्म वाटणेही थांबवले होते, मात्र शिवसेना नेत्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेरीस दुस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असे त्यांनी म्हटले आहे. 
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे - राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात याविषयी भाष्य केले आहे. 'युती तुटली त्यादिवशी माझी उद्धवसोबत फोनवरून चर्चा झाली होती. आपण चर्चा
 करावी, सभांमध्ये एकमेकांवर टीका करायची नाही आणि बाकीेचे निवडणुकीनंतर बघू असे तीन मुद्दे त्यांनी माझ्याकडे मांडले.  यावर मी सहमती दर्शवली होती' असे राज ठाकरेंनी सांगितले. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर शिवसेनेकडून अनिल देसाई व अन्य एक नेता यांच्यात चर्चा होणार असेही आमच्यात ठरले होते. त्याप्रमाणे बाळा नांदगावकरांनी अनेक वेळा अनिल देसाईंना फोन करून भेटण्याविषयी विचारले. मात्र व्यस्त असल्याचे सांगत ते भेटण्याची वेळ पुढे-पुढे सरकवत राहिले. दुपारपर्यंत आम्ही शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट बघितली, मात्र तरीही त्यांच्याकडून कोणताही फोन न आल्याने आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.