शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

काडीमोडीचीच चर्चा, पुढे काय करणार याचा अजेंडाच नाही

By admin | Updated: October 5, 2014 02:32 IST

अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनात प्रकाश आंबेडकर यांची सर्वच पक्षांवर टीका.

अकोला- विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात काही पक्षांचा काडीमोड झाला. तो का झाला, हे आता त्यांना सांगावे लागत आहे. या काडीमोडीचीच चर्चा अधिक होत आहे. पुढील पाच वर्षे काय करणार, याचा अजेंडा कोणत्याच पक्षाकडे नसल्याची टीका करीत व्यवस्थेत बदल घडवून आणणारा सामाजिक व राजकीय अजेंडा मांडण्याचे सार्मथ्य केवळ आंबेडकरी चळवळीतच असल्याचे प्रतिपादन अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे केले. भारतीय बौद्ध महासंघाच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र दारोकार गुरुजी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून २८ वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचे महत्त्व विशद केले. परिवर्तन ही काळाची गरज आहे. हे परिवर्तन संघटना आणि माणसांपुरते र्मयादित न राहता सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी होत असेल तर त्याचे स्वागत आहे, पण ते बेगडी असेल, तर त्याचा निषेध केला पाहिजे, असे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली नाही. त्यांचे विचार पटत नसल्याने विरोध होत होता. आता उठता बसता गांधींचे नाव घेतले जात आहे. हे बेगडी परिवर्तन आहे; विचारांच्या परिवर्तनाची गरज आहे. विचारात परिवर्तन येणार नाही, तोपर्यंत सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणार नाही. ही व्यवस्था लुटारूंची झाली आहे. या व्यवस्थेत बदल करण्यासाठी अधिकाराच्या वापरावर नियंत्रण आले पाहिजे. शाळा शुल्क ठरविण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन नव्हे, तर पालक-शिक्षक संघाकडे असायला हवे. हे बदल हवे असेल तर तसे विचार करणारे लोकप्रतिनिधी विधानसभेत बसेल पाहिजे. भूमाफिया, कंत्राटदारांचे प्रतिनिधी पुन्हा निवडून आले, तर सर्वसामान्यांचा संघर्ष आता आहे, तसाच सुरू राहील. वेगवेगळ्य़ा धर्मातील लोकांचे अधिकार ठरवून दिले आहेत. या अधिकाराला सीमा नसली, तर कुणी कसाही वागतो. त्यामुळे अधिकाराच्या र्मयादा स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. ती ताकद आंबेडकरी चळवळीत आहे. नुसते विचार असून चालत नाही, तर त्यासाठी ताकद हवी आहे. ही ताकद देण्यासाठीच विचारांच्या मागे चालणारा माणूस विधानसभेत पाठविण्याचे आवाहन अँड. आंबेडकर यांनी केले. ** छोट्या राज्यात छोट्या समाजांना न्याय!महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा राज्याची लोकसंख्या ३ कोटी होती. आता ती १२ कोटींवर गेली आहे. तेव्हा जसे राज्य चालत होते, तसेच राज्य आता लोकसंख्या वाढल्यावरही चालणे शक्य नाही. लोकसंख्या जशी वाढत जाईल, तशी राज्य लहान करत जावे, तरच ती कल्याणकारी, विकसित राज्य होतील, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. गोरगरीब-उपेक्षितांचं भलं छोट्या राज्यातच होऊ शकते. विधानसभेसाठी उमेदवारी देताना छोट्या ओबीसी समाजाच्या वाट्याला ३ टक्के उमेदवारीही आली नाही. छोट्या राज्यात मतदारसंघ छोटे होऊन लहान समाजाचे महत्त्व वाढेल आणि त्यांना न्याय मिळू शकेल, असे सांगून अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीचे सर्मथन केले. ** व्यवस्थेतील वाईट वृत्तीच्या गळाला आपलेही मासे लागलेत!सध्याची राजकीय व्यवस्था वाईट वृत्तीच्या माणसांनी भरली आहे. या वाईट वृत्तीच्या गळाला आपलेही काही मासे लागले आहेत. सध्या ह्यपाकीट संस्कृतीह्ण बोकाळली आहे. तिला आळा घालण्याची वेळ आली आहे. चोरांच्या उलट्या बोबां सुरू असून, त्याचे उट्टे काढण्याची वेळ आली असल्याचे सूचक वक्तव्य करून अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतील बंडखोरांना धडा शिकविण्याचा इशारा दिला.