शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

" कृत्रिम पाऊस" ठरू शकतो दुष्काळात शेतकऱ्यांचा तारणहार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 14:14 IST

महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़.

ठळक मुद्देकर्नाटकात यशस्वी झाला होता प्रयोग : मान्सून ब्रेकमध्ये उपयुक्त कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर पावसाळ्यात त्याचा फायदा

विवेक भुसे 

पुणे : महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़. आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर प्रत्यक्ष पावसाळ्यात त्याचा फायदा होऊ शकेल़. साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) यांची काठमांडु येथे नुकतीच परिषद झाली़. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा जवळपास ४० टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे़. चार महिन्यासाठीचा हा अंदाज व्यक्त केला आहे़. 

क्लायपॅक या संस्थेने केलेल्या अभ्यासात ढगांमधील बाष्पकण एकत्र करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने प्रयत्न केल्यास जास्त पाऊस मिळू शकतो़. याबाबत क्लायपॅकचे प्रकल्प संचालक डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पावर आम्ही ३ वर्षे अभ्यास केला़. ढगांचे निरीक्षण करुन पाऊस कमी पाडतो, याचे निरीक्षण नोंदविले़. २०१७ मध्ये कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता़. त्याला आम्ही मार्गदर्शन केले होते़. कर्नाटकमध्ये दर ५ किमीवर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत़. वर्षाधारे या प्रकल्पात जेव्हा ढगांवर फवारणी केली़. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटात ते ढग ज्या दिशेने केले़. त्या ठिकाणच्या पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़ त्याचवेळी ज्या ढगांवर फवारणी केली नाही़. त्यातून मिळालेला पाऊस याची तुलना केली तर त्या प्रयोगात २९ टक्के पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़. कर्नाटकने ३ रडार, २ विमाने भाड्याने घेतली होती़. त्यासाठी साधारण ३० कोटी रुपयांचा खर्च आला होता़. रडार असेल तर हा खर्च खूप कमी होतो़. या खर्चाच्या मानाने दुष्काळी भागात तब्बल २़१ टीएमसी अधिक पाणी उपलब्ध झाले होते़. (खडकवासला धरणापेक्षा अधिक पाणी) त्याचवेळी या पावसाने खंड काळात पिके वाचल्याने झालेल्या फायद्याचा विचार केल्यास तो कितीतरी पट आहे़. कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी करण्यास काही कालावधी लागतो़. रडार , विमाने परदेशातून आणावी लागतात़ त्यामुळे जून, जुलैमध्ये पाऊस कमी पडल्यानंतर हालचाली सुरु केल्यास प्रत्यक्षात प्रयोग सुरु होण्यास ऑगस्ट उजाडतो़. त्यावेळी आकाशात आवश्यक ढग नसेल तर त्याचा उपयोग होत नाही़. सुदैवाने पाऊस जास्त झाला तरी पावसाळ्यात अनेकदा खंड येतो़. विशेषत: जुलैमध्ये पावसात नेहमी खंड पडून पेरणी वाया जाते़. या काळात जर कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास व त्यातून थोडा जरी पाऊस मिळाला तरी पिके जगविता येतील़. जमिनीतील ओलावा कायम ठेवणे शक्य होऊ शकते़ त्यादृष्टीने कृत्रिम पावसाचे अधिक महत्व आहे़. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसdroughtदुष्काळ