शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

" कृत्रिम पाऊस" ठरू शकतो दुष्काळात शेतकऱ्यांचा तारणहार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 14:14 IST

महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़.

ठळक मुद्देकर्नाटकात यशस्वी झाला होता प्रयोग : मान्सून ब्रेकमध्ये उपयुक्त कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर पावसाळ्यात त्याचा फायदा

विवेक भुसे 

पुणे : महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफ चा अंदाज व्यक्त केला आहे़. आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर प्रत्यक्ष पावसाळ्यात त्याचा फायदा होऊ शकेल़. साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) यांची काठमांडु येथे नुकतीच परिषद झाली़. त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा जवळपास ४० टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे़. चार महिन्यासाठीचा हा अंदाज व्यक्त केला आहे़. 

क्लायपॅक या संस्थेने केलेल्या अभ्यासात ढगांमधील बाष्पकण एकत्र करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने प्रयत्न केल्यास जास्त पाऊस मिळू शकतो़. याबाबत क्लायपॅकचे प्रकल्प संचालक डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पावर आम्ही ३ वर्षे अभ्यास केला़. ढगांचे निरीक्षण करुन पाऊस कमी पाडतो, याचे निरीक्षण नोंदविले़. २०१७ मध्ये कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता़. त्याला आम्ही मार्गदर्शन केले होते़. कर्नाटकमध्ये दर ५ किमीवर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत़. वर्षाधारे या प्रकल्पात जेव्हा ढगांवर फवारणी केली़. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटात ते ढग ज्या दिशेने केले़. त्या ठिकाणच्या पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़ त्याचवेळी ज्या ढगांवर फवारणी केली नाही़. त्यातून मिळालेला पाऊस याची तुलना केली तर त्या प्रयोगात २९ टक्के पावसात वाढ झाल्याचे दिसून आले़. कर्नाटकने ३ रडार, २ विमाने भाड्याने घेतली होती़. त्यासाठी साधारण ३० कोटी रुपयांचा खर्च आला होता़. रडार असेल तर हा खर्च खूप कमी होतो़. या खर्चाच्या मानाने दुष्काळी भागात तब्बल २़१ टीएमसी अधिक पाणी उपलब्ध झाले होते़. (खडकवासला धरणापेक्षा अधिक पाणी) त्याचवेळी या पावसाने खंड काळात पिके वाचल्याने झालेल्या फायद्याचा विचार केल्यास तो कितीतरी पट आहे़. कृत्रिम पावसाची यंत्रणा उभी करण्यास काही कालावधी लागतो़. रडार , विमाने परदेशातून आणावी लागतात़ त्यामुळे जून, जुलैमध्ये पाऊस कमी पडल्यानंतर हालचाली सुरु केल्यास प्रत्यक्षात प्रयोग सुरु होण्यास ऑगस्ट उजाडतो़. त्यावेळी आकाशात आवश्यक ढग नसेल तर त्याचा उपयोग होत नाही़. सुदैवाने पाऊस जास्त झाला तरी पावसाळ्यात अनेकदा खंड येतो़. विशेषत: जुलैमध्ये पावसात नेहमी खंड पडून पेरणी वाया जाते़. या काळात जर कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास व त्यातून थोडा जरी पाऊस मिळाला तरी पिके जगविता येतील़. जमिनीतील ओलावा कायम ठेवणे शक्य होऊ शकते़ त्यादृष्टीने कृत्रिम पावसाचे अधिक महत्व आहे़. 

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसdroughtदुष्काळ