शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:57 IST

दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत एकमेकांना दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. उद्धव ठाकरेंनी अट टाकत एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानाचा उद्धव सेनेने दुसऱ्या दिवशी खुलासा करत कोणतीही अट नाही, असे म्हटले असून एकत्र येण्याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, यापूर्वी दोनदा उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा अनुभव गाठीशी असल्याने मनसेने दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरवू नये अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

सत्ताधारी भाजपकडून यावर सध्या वेट ॲण्ड वॉचची भूमिका असली तरी ‘ती अट आहे की कट’ असे विधान करत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंना उचकवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार यावर बोलताना मविआतील शरद पवार गटाने ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही. फक्त महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि महाराष्ट्र हिताच्या शत्रूंबरोबर यापुढे हात मिळवणी करणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. प्रमुखांनी भाष्य केल्यावर बाकी मनसे नेत्यांनी कशाला वाद हवा? संजय राऊत, उद्धवसेना

कोण हिंदुत्ववादी नाही हे प्रमाणपत्र भाजपने देऊ नये. तसेच उबाठानेही हा महाराष्ट्रद्रोही आहे, असे प्रमाणपत्र कोणाला देऊ नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे सैनिकांवर १७ हजार गुन्हे दाखल झाले होते.  त्याबद्दल उद्धव ठाकरे मनसेची माफी मागणार का? - संदीप देशपांडे, मनसे नेते

एकाने साद घातली आहे, एकाने अट घातली आहे. पण ती अट आहे की कट आहे ते दोघांनी ठरवावे. त्यांनी आपआपसात ठरवले तर त्यांना शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी आपापल्या कुटुंबात सुखी रहावे आमचे काहीही म्हणणे नाही. तो आनंदाचा विषय आहे. - आशिष शेलार, मंत्री व भाजप नेते

राज ठाकरे यांच्या मनात काय चालले आहे हे कुणीच सांगू शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत जावे, हा त्यांच्या पक्षांचा विषय आहे. युतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही नेते सक्षम आहेत. त्यामध्ये इतरांनी बोलणे उचित नाही. - गुलाबराव पाटील, मंत्री व शिंदेसेनेचे नेते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पण, समाेरच्यांकडून कशा पद्धतीने ते कमी लेखण्यात आले हे दिसले. उद्धव ठाकरे यांचे उत्तर म्हणजे शाळेतील भांडणासारखे आहे. - उदय सामंत, मंत्री व शिंदेसेनेचे नेते

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे