शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी विसरली म्हणून सुर्डी जिंकली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:47 IST

विक्रमी लोकसहभागाचं योगदान: राज्यात प्रथम येण्याच्या ध्येयानंच केली जलसंधारणाची कामे

ठळक मुद्देसुर्डी गाव तसं पूर्वीपासूनच सधन व बागायती म्हणून ओळखगावाच्या शिवारात २५ टक्के डोंगराळ भाग. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी विहिरी तळ गाठायच्यापंचेचाळीस दिवस चाललेल्या या स्पर्धेत दररोज अडीच हजारांहून अधिक गावकºयांनी श्रमदान केले

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी: सुर्डी गाव तसं पूर्वीपासूनच सधन व बागायती म्हणून ओळख... गावाच्या शिवारात २५ टक्के डोंगराळ भाग. मात्र उन्हाळ्यात दरवर्षी विहिरी तळ गाठायच्या. हा नेहमीचाच अनुभव. परंतु यावर्षी उन्हाळ्यातदेखील गावातील विहिरी पाण्याने डबडबल्या पाहिजेत, असा गावकºयांनी ठाम निर्धार करीत पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला. पंचेचाळीस दिवस चाललेल्या या स्पर्धेत दररोज अडीच हजारांहून अधिक गावकºयांनी श्रमदान करत राज्यात नंबर आणायचाच या उद्देशाने जिद्दीला पेटून काम केले़ हे करीत असताना मनसंधारण, मृदसंधारण, जलसंधारण, वृक्षारोपण आदी गुणवत्तेची कामे करुन विक्रमी लोकसहभाग मिळविला़ त्याचेच फलित गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला़ या पहिल्या क्रमांकाच्या उत्तेजनाने गावकºयांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली़ 

तालुक्यातील वैराग भागातील सुर्डी हे ३ हजार ३७७ लोकवस्तीचे गाव. गावामध्ये ७५७ कुटुंबं राहतात. गावाचे क्षेत्र २ हजार ३७४ हेक्टर असून, खातेदारांची संख्या १ हजार ५७० आहे. यापैकी रब्बीचे क्षेत्र ८१० हेक्टर तर उर्वरित क्षेत्र खरीप व बागायती आहे. यावर्षी पाणी फाउंडेशनचे नितीन आतकरे गावात आले व त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार मधुकर डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांची टीम पाणी फाउंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करुन आली. त्यानंतर सहा जणांच्या तीन टीम पाठवून अठरा जणांनी प्रशिक्षण घेतले़ पुढे गावातील सर्व राजकीय गटांच्या व्यक्तींना एकत्रित बोलावून सव्वा महिना त्यांचे मनसंधारण केले. प्रोजेक्टरच्या सहाय्याने वाड्यावस्त्यांवर जलसाक्षरता केली. दररोज २० ते २५ किलोमीटर शिवारफेरी केली. साहित्य खरेदी करुन निधी संकलनाला सुरुवात करुन यंदा वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन गावाला पाणीदार करावयाचे, असा निर्णय झाला.

८ एप्रिलला श्रमदानाचे काम करण्यासाठी तब्बल ७९० नागरिक जमा झाले. दुसºया दिवशी ही संख्या १ हजार व पुढे १३०० वर गेली. पुढे हा आकडा वाढत जाऊन दोन ते अडीच हजारांवर स्थिरावला़ एका दिवशी तर तब्बल तीन हजार लोक श्रमदानाच्या कामावर होते़२०० पेक्षा जास्त कुटुंबांची कामांवर हजेरी होती़ लहान मुलांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा सहभाग होता़ 

 स्पर्धेच्या कालावधीत सुर्डीकरांनी श्रमदानातून म्हणजे मनुष्यबळातून १७५०० घ़ मी़ काम करणे गरजेचे असताना २२ हजार घ़ मी़ काम, मशीनच्या सहाय्याने २ लाख ५२ हजार ४०० मीटरऐवजी ३ लाख घ़ मी़ काम केले़ यात १४ कि़ मी़ लांबीचे डी़प़ीसी़टी़टी़ मशीनच्या सहाय्याने, ३२ हजार घ़़मी़ कंपार्टमेंट बंडिंग, २७ इनलेट-आऊटलेट शेततळी,२७ हजार घ़ मी़ (३ कि़मी़) ओढा खोलीकरण, दगडी पिंचिंग, ५ विहिरी पुनर्भरण, ७०० जलशोषक चर, १६०० वृक्षारोपण, ६१२ शोषखड्डे गावात घेतले. त्यामुळे उन्हाळ्यात हातपंपाला पाणी वाढले़ माथा ते पायथा हे जलसंधारणाचे सर्व उपचार या स्पर्धा कालावधीत केले़ कित्येक वर्षे जाता येत नव्हते असे रस्ते खुले केले़ विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ केले़ त्यामुळेच हे गाव आज राज्यात प्रथम आले़

सर्वांचा सहभाग - गावातील ७५ पेक्षा जास्त वयाच्या महिलांनी नाश्त्याचे व स्वयंपाकाचे काम केले तर ज्येष्ठ नागरिकांनी पाणी वाटपाचे आणि लहान मुलांनी दगडगोटे गोळा करण्याचे काम मनोभावे केले़ दररोजचा नाश्ता देण्यासाठी गावकºयांची चढाओढ होती़त्यासाठी चिठ्ठी काढून नाश्ता खाऊ घालण्याचा मान दिला होता़ श्रमदानाचे काम गावापासून लांब असल्याने गावातील १२ वाहनमालकांनी मोफत ने-आण करण्यासाठी वाहने दिली. दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत हॉटेल, सलून व इतर व्यवसाय बंद ठेवले जातात. तात्यासाहेब शेळके हे एक पाय नसलेले व प्रकाश डोईफोडे हे एक हात नसलेले नागरिकही दररोज श्रमदान करण्यासाठी येऊन काम करणाºयांचा उत्साह वाढवत होते. या सर्व कामांत महिलांचा सहभागही मोठा होता़ यात माणसांना कामांवर बोलावणारी, कामांची मोजमापे व मशीनवर्क , स्पिकरद्वारे बोलावणी अशा वेगवेगळ्या टीमला कामे वाटून दिली होती़ या सर्वांवर प्रशिक्षण घेतलेली टीम कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देत होती़ सुर्डीकरांनी मनावर घेऊन हे काम चालू केल्याने गावात खºया अर्थाने तुफान आलंया असे चित्र निर्माण झाले होते़

यांनी केले सहकार्य - या कामांसाठी बालाजी अमाईन्स सोलापूर ११० तास पोकलेन मशीन, स्नेहालय अहमदनगर यांची एक लाखाची ईश्वरी चिठ्ठी, अनिवासी सुर्डीकरांची पाच लाखांची मदत, विक्रीकर उपायुक्त प्रकाश शेळके यांचीही भरीव आर्थिक मदत, गावातील माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, इतर नोकरदार यांनी ठरवून दिलेली रक्कम दिली़ शिवाय गावकºयांनी सर्वच बाबतीत सहभाग नोंदवला़ 

४३ लाखांचा लोकसहभाग - या कालावधीत अन्नदानावर लोकसहभागातून साडेतीन लाख रुपये खर्च झाले़ ४३ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली़ महिलांनी त्यांच्याकडे जमा झालेले २५ हजार दिले़ रोजचे वाढदिवस,पुण्यतिथी कामावर साजरी केली गेली़ आचारी सेवा, वाहन सेवा, गॅस ,पाणी आदी सेवा गावकºयांनी मोफत दिल्या़ 

यांनी दिल्या भेटी, विक्रमी गर्दीची ग्रामसभा - गावातील ग्रामसभा या विक्रमी गर्दीच्या झाल्या़ पोपटराव पवार,कृषी अधिकारी डी़एल़ मोहिते व जलसंधारण तज्ज्ञ हरीश डावरे यांच्या टीमने गावाची पाहणी केली़ त्यादिवशीच्या ग्रामसभेला तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते़ डॉ़ अविनाश पौळ यांनीही गावाला भेट दिली होती़ 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा