शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

कृषी सुधारणा विधेयके राज्य सरकार मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 8:22 AM

जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या.

अतुल कुलकर्णी - 

मुंबई : शेतकऱ्यांच्या देशभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे या कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करणारी तीन विधेयके राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडली होती. ती विधेयके आता राज्य सरकार परत घेणार आहे. त्यामुळे राज्यात पूर्वीचीच कृषी धोरणे आणि कायदे लागू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून मागील अधिवेशनात शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) सुधारणा कायदा २०२१, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार सुधारणा कायदा २०२१ अत्यावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२१ महाराष्ट्र सरकारकडून विधिमंडळात मांडण्यात आले होते. जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या. विधिमंडळाकडे हे कायदेदेखील मागे घ्यावेत, अशी निवेदने मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली होती. राज्यभर यानिमित्ताने झालेल्या परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कायदेच रद्द करावेत, हा पर्याय समोर आला होता. अधिकच्या हरकती कायदे रद्द करण्याच्या बाजूनेच होत्या.राज्य सरकारने मांडलेल्या सुधारणा विधेयकात बाजार समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्यात आले होते, फसवणूक झाल्यास शेतकऱ्याला दाद मागण्यासाठी व्यवस्था उभी करून देण्यात आली होती. 

हिवाळी अधिवेशनात विधेयके मागे घेऊ - थोरात कृषी कायदे सुधारणा मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लोकमतशी बोलताना म्हणाले, आता केंद्र सरकारने हे कायदे रद्द केल्यामुळे राज्य सरकारही आपली सुधारणा विधेयके येत्या अधिवेशनात मागे घेईल. आमचा हेतू शेतकऱ्यांना अधिक बळकट करणे हा होता. आम्ही सुचविलेल्या सुधारणा त्या दृष्टीने पथदर्शक होत्या, पण आता मूळ कायदाच राहिला नाही, तर सुधारणा विधेयकेही ठेवण्यात अर्थ नाही. म्हणून आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयके मागे घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFarmerशेतकरी