शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

"विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळा सुरू करा; प्रत्येक पाऊल जपून टाकावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 12:47 PM

शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण  असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सीमा महांगडे -

मुंबई : लवकरच शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. त्यांना काही दिवसांत शाळेत पाठवायचा निर्णय घेताना प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. शाळेत जाणारे मूल हे शाळा प्रशासन व पालक या दोघांच्या केंद्रस्थानी राहील, यासाठी आखणी करणे गरजेचे असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ आणि चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य व्यक्त करीत आहेत.

शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण  असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळा सुरु करणे हा स्वागतार्ह निर्णय असून मुलांच्या उपस्थितीबाबत शिक्षण विभागाने ठेवलेली लवचिकता महत्त्वाची असल्याचे मत चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य आणि मुलांच्या वर्तन विकासातील तज्ज्ञ समीर दलवाई यांनी व्यक्त केले. मागील दीड वर्षाहून अधिकच्या काळात मुलांच्या खाण्याच्या, बसण्याच्या, शिस्तीच्या सवयीत बदल झाल्याने ते हळूहळू पूर्ववत होईल याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. तसेच शाळा सुरु झाल्यावर अभ्यासक्रम कसा, कुठून, केवढा असायला हवा यायचे नियोजन करायला हवे. त्यामुळे मुलांना एकदम अभ्यासाचा ताण येणार नाही, असे मत त्यांनी मांडले. 

चाईल्ड टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचा अवलंब शाळा सुरु करताना होईलच मात्र या शिवाय हायब्रीड मॉडेल म्हणजे काही दिवस ऑनलाइन, काही दिवस ऑफलाइन अशा पद्धतीने वर्गांचे नियोजन केल्यास मुलांना वातावरणात पूर्ववत होण्यास मदत होईल असा सल्ला चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी दिला. 

याशिवाय स्वच्छतागृहांची, वर्गांची, बाकांची स्वच्छता आवश्यक आहेच मात्र मुलांचा डब्बा, पिण्याचे पाणी त्यांनी स्वतः आणले पाहिजे. सुरुवातीच्या शाळांच्या दिवसांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भागापेक्षा भावनिक, मानसिक भागावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास मुलांसाठी सोयीचे ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

‘संवाद साधणे गरजेचे’शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांसह पालकांनी अभ्यास एके अभ्यास करून चालणार नाही तर सुरुवातीच्या काळात संवाद, गप्पा गोष्टी यांच्यातून मुलांना मोकळे करायला हवे. त्यांना असलेला मानसिक ताण, कोंडी यातून ते बाहेर पडतील याची काळजी घ्यायला हवी.  

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार